शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

१८९० च्या दशकात बनले अजनी लोकोशेड व कॉलनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

नागपूर : अजनी रेल्वे कॉलनी ही केवळ निवासी वसाहत नाही तर ती १०० वर्षापूर्वी घडलेल्या ऐतिहासिक घटनाक्रमांची साक्षीदार आहे. ...

नागपूर : अजनी रेल्वे कॉलनी ही केवळ निवासी वसाहत नाही तर ती १०० वर्षापूर्वी घडलेल्या ऐतिहासिक घटनाक्रमांची साक्षीदार आहे. येथील पुरातन वृक्षांनाच महत्त्व नाही तर त्या काळच्या आर्किटेक्चरनुसार तयार झालेले क्वाॅर्टर्स व इतर बांधकामालाही पुरातत्वाचे महत्त्व आहे. १८८० च्या दशकात जेव्हा पहिली कोळशावर चालणारी (स्टीम इंजिन) रेल्वे धावल्यानंतर ही वसाहत विकसित व्हायला सुरुवात झाली.

भारतात १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे मार्गावर पहिली रेल्वे गाडी धावली. इंग्रजांनी दळणवळणासाठी ती सुरू केली होती. पुढे १८६७ मध्ये मुंबई ते नागपूर गाडी सुरू करण्यात आली. नागपूर मध्यभागी असल्याने शहराचे महत्त्व इंग्रजांनी ओळखले होते. रेल्वेच्या शब्दावलीत नागपूरला ‘डायमंड क्रॉसिंग’ असे संबोधले गेले आहे. १८८१ मध्ये नागपूरहून राजनांदगाव गाडी सुरू करण्यात आली व पुढे तिला कोलकातापर्यंत वाढविण्यात आले आणि नागपूर-बंगाल असे नाव देण्यात आले. यानंतर खऱ्या अर्थाने अजनी रेल्वे स्टेशनच्या विकासाला सुरुवात झाली. स्टेशन तयार झाल्यानंतर स्टीम इंजिनचे लाेकाेशेड आणि इंजिनिअरिंग वर्कशाॅप निर्माण करण्यात आले. यानंतर डिझेल इंजिनचे व आधुनिक काळात इलेक्ट्रीक इंजिनिअर्स वर्कशाॅप तयार करण्यात आले.माेक्याची जागा लक्षात घेत इंग्रजांनी गर्द वनराईत ही वसाहत तयार केली.

सखाचे प्रधान आर्किटेक्ट व पुरातत्त्व अभ्यासक संदीप पथे यांच्या टीमने या अजनीतील वसाहतीचे विश्लेषण केले. येथील क्वाॅर्टर इंग्रज अधिकाऱ्यांच्या रॅंकनुसार तयार करण्यात आले हाेते. त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. त्या क्वाॅर्टर्सचे गेट आणि फेन्सिंगही वेगळ्या पद्धतीचे आहे. वेगळ्या प्रकारच्या दगडांचा उपयाेग करून तयार झालेल्या बांधकामाचे स्ट्रक्चरमध्ये ब्रिटिश आर्किटेक्टची झलक बघायला मिळते. आतमध्ये असलेल्या प्राथमिक आराेग्य केंद्राचे बांधकामही याची साक्ष पटवते. हा ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता काय

ग्रीन व्हीजिलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी यांनी एनएचएआयद्वारे प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे आणि शहराबाहेर त्याचा विचार शक्य नाही. मात्र एनएचएआयने या प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता तपासणे गरजेचे आहे. परिसरात किती व काेणत्या प्रजातीचे वृक्ष आहेत व त्यांचे महत्त्व किती याबाबत सर्वेक्षण हाेणे गरजेचे आहे. यासाठी एनएचएआयने महापालिकेची मदत घ्यायला हवी. यानंतर माॅडेल स्टेशनमुळे किती इंधन वाचेल व त्यामुळे किती काॅर्बन रोखणे शक्य हाेइल, याची आकडेवारी सादर करावी. पुढे प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी, मनपा तसेच एनजीओ यांची चिंतन बैठक घेऊन विश्लेषण करावे. काॅलनी, शाळा व रुग्णालय कुठे शिफ्ट करणार व त्यासाठी किती वृक्षताेड करणार, याचीही माहिती सादर करावी, असे आवाहन चटर्जी यांनी केले.