शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

१८९० च्या दशकात बनले अजनी लोकोशेड व कॉलनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

नागपूर : अजनी रेल्वे कॉलनी ही केवळ निवासी वसाहत नाही तर ती १०० वर्षापूर्वी घडलेल्या ऐतिहासिक घटनाक्रमांची साक्षीदार आहे. ...

नागपूर : अजनी रेल्वे कॉलनी ही केवळ निवासी वसाहत नाही तर ती १०० वर्षापूर्वी घडलेल्या ऐतिहासिक घटनाक्रमांची साक्षीदार आहे. येथील पुरातन वृक्षांनाच महत्त्व नाही तर त्या काळच्या आर्किटेक्चरनुसार तयार झालेले क्वाॅर्टर्स व इतर बांधकामालाही पुरातत्वाचे महत्त्व आहे. १८८० च्या दशकात जेव्हा पहिली कोळशावर चालणारी (स्टीम इंजिन) रेल्वे धावल्यानंतर ही वसाहत विकसित व्हायला सुरुवात झाली.

भारतात १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे मार्गावर पहिली रेल्वे गाडी धावली. इंग्रजांनी दळणवळणासाठी ती सुरू केली होती. पुढे १८६७ मध्ये मुंबई ते नागपूर गाडी सुरू करण्यात आली. नागपूर मध्यभागी असल्याने शहराचे महत्त्व इंग्रजांनी ओळखले होते. रेल्वेच्या शब्दावलीत नागपूरला ‘डायमंड क्रॉसिंग’ असे संबोधले गेले आहे. १८८१ मध्ये नागपूरहून राजनांदगाव गाडी सुरू करण्यात आली व पुढे तिला कोलकातापर्यंत वाढविण्यात आले आणि नागपूर-बंगाल असे नाव देण्यात आले. यानंतर खऱ्या अर्थाने अजनी रेल्वे स्टेशनच्या विकासाला सुरुवात झाली. स्टेशन तयार झाल्यानंतर स्टीम इंजिनचे लाेकाेशेड आणि इंजिनिअरिंग वर्कशाॅप निर्माण करण्यात आले. यानंतर डिझेल इंजिनचे व आधुनिक काळात इलेक्ट्रीक इंजिनिअर्स वर्कशाॅप तयार करण्यात आले.माेक्याची जागा लक्षात घेत इंग्रजांनी गर्द वनराईत ही वसाहत तयार केली.

सखाचे प्रधान आर्किटेक्ट व पुरातत्त्व अभ्यासक संदीप पथे यांच्या टीमने या अजनीतील वसाहतीचे विश्लेषण केले. येथील क्वाॅर्टर इंग्रज अधिकाऱ्यांच्या रॅंकनुसार तयार करण्यात आले हाेते. त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. त्या क्वाॅर्टर्सचे गेट आणि फेन्सिंगही वेगळ्या पद्धतीचे आहे. वेगळ्या प्रकारच्या दगडांचा उपयाेग करून तयार झालेल्या बांधकामाचे स्ट्रक्चरमध्ये ब्रिटिश आर्किटेक्टची झलक बघायला मिळते. आतमध्ये असलेल्या प्राथमिक आराेग्य केंद्राचे बांधकामही याची साक्ष पटवते. हा ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता काय

ग्रीन व्हीजिलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी यांनी एनएचएआयद्वारे प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे आणि शहराबाहेर त्याचा विचार शक्य नाही. मात्र एनएचएआयने या प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता तपासणे गरजेचे आहे. परिसरात किती व काेणत्या प्रजातीचे वृक्ष आहेत व त्यांचे महत्त्व किती याबाबत सर्वेक्षण हाेणे गरजेचे आहे. यासाठी एनएचएआयने महापालिकेची मदत घ्यायला हवी. यानंतर माॅडेल स्टेशनमुळे किती इंधन वाचेल व त्यामुळे किती काॅर्बन रोखणे शक्य हाेइल, याची आकडेवारी सादर करावी. पुढे प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी, मनपा तसेच एनजीओ यांची चिंतन बैठक घेऊन विश्लेषण करावे. काॅलनी, शाळा व रुग्णालय कुठे शिफ्ट करणार व त्यासाठी किती वृक्षताेड करणार, याचीही माहिती सादर करावी, असे आवाहन चटर्जी यांनी केले.