शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

१८९० च्या दशकात बनले अजनी लोकोशेड व कॉलनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

नागपूर : अजनी रेल्वे कॉलनी ही केवळ निवासी वसाहत नाही तर ती १०० वर्षापूर्वी घडलेल्या ऐतिहासिक घटनाक्रमांची साक्षीदार आहे. ...

नागपूर : अजनी रेल्वे कॉलनी ही केवळ निवासी वसाहत नाही तर ती १०० वर्षापूर्वी घडलेल्या ऐतिहासिक घटनाक्रमांची साक्षीदार आहे. येथील पुरातन वृक्षांनाच महत्त्व नाही तर त्या काळच्या आर्किटेक्चरनुसार तयार झालेले क्वाॅर्टर्स व इतर बांधकामालाही पुरातत्वाचे महत्त्व आहे. १८८० च्या दशकात जेव्हा पहिली कोळशावर चालणारी (स्टीम इंजिन) रेल्वे धावल्यानंतर ही वसाहत विकसित व्हायला सुरुवात झाली.

भारतात १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे मार्गावर पहिली रेल्वे गाडी धावली. इंग्रजांनी दळणवळणासाठी ती सुरू केली होती. पुढे १८६७ मध्ये मुंबई ते नागपूर गाडी सुरू करण्यात आली. नागपूर मध्यभागी असल्याने शहराचे महत्त्व इंग्रजांनी ओळखले होते. रेल्वेच्या शब्दावलीत नागपूरला ‘डायमंड क्रॉसिंग’ असे संबोधले गेले आहे. १८८१ मध्ये नागपूरहून राजनांदगाव गाडी सुरू करण्यात आली व पुढे तिला कोलकातापर्यंत वाढविण्यात आले आणि नागपूर-बंगाल असे नाव देण्यात आले. यानंतर खऱ्या अर्थाने अजनी रेल्वे स्टेशनच्या विकासाला सुरुवात झाली. स्टेशन तयार झाल्यानंतर स्टीम इंजिनचे लाेकाेशेड आणि इंजिनिअरिंग वर्कशाॅप निर्माण करण्यात आले. यानंतर डिझेल इंजिनचे व आधुनिक काळात इलेक्ट्रीक इंजिनिअर्स वर्कशाॅप तयार करण्यात आले.माेक्याची जागा लक्षात घेत इंग्रजांनी गर्द वनराईत ही वसाहत तयार केली.

सखाचे प्रधान आर्किटेक्ट व पुरातत्त्व अभ्यासक संदीप पथे यांच्या टीमने या अजनीतील वसाहतीचे विश्लेषण केले. येथील क्वाॅर्टर इंग्रज अधिकाऱ्यांच्या रॅंकनुसार तयार करण्यात आले हाेते. त्यांचा पॅटर्न वेगळा आहे. त्या क्वाॅर्टर्सचे गेट आणि फेन्सिंगही वेगळ्या पद्धतीचे आहे. वेगळ्या प्रकारच्या दगडांचा उपयाेग करून तयार झालेल्या बांधकामाचे स्ट्रक्चरमध्ये ब्रिटिश आर्किटेक्टची झलक बघायला मिळते. आतमध्ये असलेल्या प्राथमिक आराेग्य केंद्राचे बांधकामही याची साक्ष पटवते. हा ऐतिहासिक वारसा संवर्धन करण्याची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता काय

ग्रीन व्हीजिलचे संस्थापक काैस्तुभ चटर्जी यांनी एनएचएआयद्वारे प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पाच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला. शहराच्या विकासाच्या दृष्टीने प्रकल्प अतिशय उपयुक्त आहे आणि शहराबाहेर त्याचा विचार शक्य नाही. मात्र एनएचएआयने या प्रकल्पाची पर्यावरणीय व्यवहार्यता तपासणे गरजेचे आहे. परिसरात किती व काेणत्या प्रजातीचे वृक्ष आहेत व त्यांचे महत्त्व किती याबाबत सर्वेक्षण हाेणे गरजेचे आहे. यासाठी एनएचएआयने महापालिकेची मदत घ्यायला हवी. यानंतर माॅडेल स्टेशनमुळे किती इंधन वाचेल व त्यामुळे किती काॅर्बन रोखणे शक्य हाेइल, याची आकडेवारी सादर करावी. पुढे प्रदूषण नियंत्रण मंडळ, नीरी, मनपा तसेच एनजीओ यांची चिंतन बैठक घेऊन विश्लेषण करावे. काॅलनी, शाळा व रुग्णालय कुठे शिफ्ट करणार व त्यासाठी किती वृक्षताेड करणार, याचीही माहिती सादर करावी, असे आवाहन चटर्जी यांनी केले.