शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

अजनी रेल्वे पूल ठरू शकतो धोकादायक : मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:05 PM

मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीसुद्धा हा पूल तोडण्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसून या पुलावर कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देरेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले होते पाडण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीसुद्धा हा पूल तोडण्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसून या पुलावर कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.अजनी रेल्वेस्थानकापासून वंजारीनगरकडे जाण्याच्या मार्गावर ब्रिटिशांनी १०० वर्षांपूर्वी पूल बांधला होता. या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला एक पत्र लिहिले होेते. या पत्रात पुलाची मुदत संपली असून या पुढे हा पूल वापरावयाचा असल्याच तुमच्या जबाबदारीवर वापरावा, असे नमूद करण्यात आले होते. ब्रिटिशांनी दिलेल्या पत्रावर रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु अजनी रेल्वे पुलाची डागडुजी करून अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहनचालक ये-जा करतात. एखाद्या प्रसंगी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाच्या ठिकाणी नव्याने पूल तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले होते पाडण्याचे आदेशरेल्वे राज्यमंत्री अधिर रंजन चौधरी यांनी डिसेंबर २०१३ मध्ये अजनी रेल्वेस्थानकाला भेट दिली होती. यावेळी विविध रेल्वे संघटनांनी अजनी रेल्वे पुलाची मुदत संपल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर त्यांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना त्वरित हा पूल तोडण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याची सूचना केली होती. परंतु तरीसुद्धा या पुलाबाबत अद्याप काही कारवाई होऊ शकली नाही.अजनी पूल सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक‘अजनी रेल्वे पुलाची मुदत संपल्यानंतर ब्रिटिशांनी रेल्वे प्रशासनाला कळविले होते. त्यावर प्रशासनाने कारवाई करून नवा पूल तयार करण्याची गरज होती. परंतु रेल्वे प्रशासनाने त्यावर काहीच उपाययोजना केली नाही. हा पूल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असून दुर्घटना घडण्यापूर्वी हा पूल तोडण्याची गरज आहे.’बसंत कुमार शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर