शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

अजनी रेल्वे पूल ठरू शकतो धोकादायक : मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:06 IST

मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीसुद्धा हा पूल तोडण्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसून या पुलावर कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देरेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले होते पाडण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीसुद्धा हा पूल तोडण्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसून या पुलावर कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.अजनी रेल्वेस्थानकापासून वंजारीनगरकडे जाण्याच्या मार्गावर ब्रिटिशांनी १०० वर्षांपूर्वी पूल बांधला होता. या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला एक पत्र लिहिले होेते. या पत्रात पुलाची मुदत संपली असून या पुढे हा पूल वापरावयाचा असल्याच तुमच्या जबाबदारीवर वापरावा, असे नमूद करण्यात आले होते. ब्रिटिशांनी दिलेल्या पत्रावर रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु अजनी रेल्वे पुलाची डागडुजी करून अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहनचालक ये-जा करतात. एखाद्या प्रसंगी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाच्या ठिकाणी नव्याने पूल तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले होते पाडण्याचे आदेशरेल्वे राज्यमंत्री अधिर रंजन चौधरी यांनी डिसेंबर २०१३ मध्ये अजनी रेल्वेस्थानकाला भेट दिली होती. यावेळी विविध रेल्वे संघटनांनी अजनी रेल्वे पुलाची मुदत संपल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर त्यांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना त्वरित हा पूल तोडण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याची सूचना केली होती. परंतु तरीसुद्धा या पुलाबाबत अद्याप काही कारवाई होऊ शकली नाही.अजनी पूल सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक‘अजनी रेल्वे पुलाची मुदत संपल्यानंतर ब्रिटिशांनी रेल्वे प्रशासनाला कळविले होते. त्यावर प्रशासनाने कारवाई करून नवा पूल तयार करण्याची गरज होती. परंतु रेल्वे प्रशासनाने त्यावर काहीच उपाययोजना केली नाही. हा पूल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असून दुर्घटना घडण्यापूर्वी हा पूल तोडण्याची गरज आहे.’बसंत कुमार शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर