शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

अजनी रेल्वे पूल ठरू शकतो धोकादायक : मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:06 IST

मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीसुद्धा हा पूल तोडण्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसून या पुलावर कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देरेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले होते पाडण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईचा पादचारी पूल कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू होऊन २३ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी घडली. नागपूरमधील अजनी रेल्वे पूलही नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक असून या पुलाची मुदत संपल्याचे पत्र ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला दिले. परंतु तरीसुद्धा हा पूल तोडण्यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलण्यात आले नसून या पुलावर कधीही दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.अजनी रेल्वेस्थानकापासून वंजारीनगरकडे जाण्याच्या मार्गावर ब्रिटिशांनी १०० वर्षांपूर्वी पूल बांधला होता. या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिशांनी आठ वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाला एक पत्र लिहिले होेते. या पत्रात पुलाची मुदत संपली असून या पुढे हा पूल वापरावयाचा असल्याच तुमच्या जबाबदारीवर वापरावा, असे नमूद करण्यात आले होते. ब्रिटिशांनी दिलेल्या पत्रावर रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु अजनी रेल्वे पुलाची डागडुजी करून अद्यापही हा पूल वाहतुकीसाठी वापरण्यात येत आहे. या पुलावरून दररोज हजारो वाहनचालक ये-जा करतात. एखाद्या प्रसंगी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाच्या ठिकाणी नव्याने पूल तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे.रेल्वे राज्यमंत्र्यांनी दिले होते पाडण्याचे आदेशरेल्वे राज्यमंत्री अधिर रंजन चौधरी यांनी डिसेंबर २०१३ मध्ये अजनी रेल्वेस्थानकाला भेट दिली होती. यावेळी विविध रेल्वे संघटनांनी अजनी रेल्वे पुलाची मुदत संपल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यावर त्यांनी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना त्वरित हा पूल तोडण्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून रेल्वे बोर्डाकडे पाठविण्याची सूचना केली होती. परंतु तरीसुद्धा या पुलाबाबत अद्याप काही कारवाई होऊ शकली नाही.अजनी पूल सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक‘अजनी रेल्वे पुलाची मुदत संपल्यानंतर ब्रिटिशांनी रेल्वे प्रशासनाला कळविले होते. त्यावर प्रशासनाने कारवाई करून नवा पूल तयार करण्याची गरज होती. परंतु रेल्वे प्रशासनाने त्यावर काहीच उपाययोजना केली नाही. हा पूल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक असून दुर्घटना घडण्यापूर्वी हा पूल तोडण्याची गरज आहे.’बसंत कुमार शुक्ला, सचिव, भारतीय यात्री केंद्र

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर