शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
6
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
7
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
8
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
9
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
10
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
11
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
12
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
13
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
14
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
15
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
16
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
17
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
20
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार

coronavirus; अन् इराणमधून मुस्लिम यात्रेकरू झाले ‘एअरलिफ्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 10:54 IST

चित्रपटाची कथा शोभावी असे घटनाचक्र इराणमध्ये अडकलेल्या ४४ मुस्लिम बांधवांनी अनुभवले. अंधकारमय स्थितीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्यासाठी आशेचा किरण घेऊन आले.

ठळक मुद्दे नितीन गडकरींनी मध्यरात्री हलविली प्रशासकीय यंत्रणा ‘कोरोना’च्या सावटात अडकले होते ४४ भाविक

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी ‘ते’ ४४ जण मोठ्या उत्साहाने इराणमध्ये पोहोचले. परंतु अचानक ‘कोरोना’चा प्रकोप वाढला अन् सर्वांच्या पायाखालील जमीनच सरकली. दिवसभर हॉटेलमध्ये मुक्काम, ना कुणाची मदत ना वैद्यकीय तपासणी. मायदेशी परतण्यासाठी काय करावे याची दिशाच मिळत नव्हती. अशा स्थितीत एका केंद्रीय मंत्र्याला त्यांची स्थिती कळते काय, मध्यरात्री प्रशासकीय यंत्रणा हलते काय अन् काही दिवसांत सर्व अडचणींच्या चक्रव्यूहाला भेदत सर्व भाविक सुखरूपपणे ‘एअरलिफ्ट’ होऊन भारतभूमीवर परततात काय! अक्षरश: चित्रपटाची कथा शोभावी असे घटनाचक्र इराणमध्ये अडकलेल्या ४४ मुस्लिम बांधवांनी अनुभवले. अंधकारमय स्थितीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्यासाठी आशेचा किरण घेऊन आले.२२ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील ४४ मुस्लिम यात्रेकरूंचा जत्था इराणकडे निघाला. त्यांनी तेहरान तसेच क्वोम इत्यादी शहरांत जाऊन प्रार्थनास्थळांचे दर्शन घेतले. या कालावधीत इराणमध्ये ‘कोरोना’ची लागण व्हायला सुुरुवात झाली व काही दिवसांतच प्रकोप जास्त प्रमाणात वाढला. सर्व यात्रेकरू चिंतित झाले होते व हॉटेल्समध्ये राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. २७ फेब्रुवारीपासून सर्व लोक तेहरानपासून ६० किलोमीटर अंतरावरील एका हॉटेलमध्येच थांबले होते. ते वैद्यकीय तपासणी तसेच भारतात परतण्यासाठी विमानाचीच प्रतीक्षा करत होते. मात्र त्यांना स्थानिक प्रशासनाकडून काहीच मदत मिळाली नाही. यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव शरफुद्दीन मोमीन हेदेखील होते. त्यांनी या स्थितीत राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी सचिव आर.एच.तडवी यांच्याशी ८ मार्च रोजी संपर्क साधला. तडवी यांनी तातडीने नितीन गडकरी यांच्या कार्यालयाला ही बाब कळविली. गडकरी यांना ही स्थिती कळताच ८ तारखेलाच मध्यरात्री ९प्रशासकीय यंत्रणेला त्यांनी कामाला लावले. गडकरी यांच्या कार्यालयातून परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांना सर्व यात्रेकरूंशी तत्काळ संपर्क साधून त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासंदर्भात तातडीने विनंती करण्यात आली.खुद्द गडकरी यांनीदेखील वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला. त्यानंतर इराणमधील भारतीय दूतावासाने यात्रेकरूंशी संपर्क साधला व भारतीय चमूने त्यांची तपासणी केली. चाचण्यांचे भारतातून अहवाल येण्यास ३ ते ४ दिवसांचा अवधी लागला व सर्व जण ‘निगेटिव्ह’ आले. त्यानंतर १५ मार्च रोजी अखेर सर्व यात्रेकरु सुखरूपपणे मायदेशी परतले. हे यात्रेकरू भारतात सुरक्षित येईपर्यंत गडकरी सातत्याने पाठपुरावा करत होते.

सर्व प्रवासी सुखरूपयात्रेकरूंनी संपर्क केल्यावर सुरुवातीला मलादेखील काहीच कळले नाही. अशा स्थितीत नितीन गडकरीच मदत करू शकतात असा विश्वास असल्याने त्यांच्या कानावरच ही गोष्ट टाकली. त्यांच्या पुढाकारामुळेच सर्व यात्रेकरू सुखरूप पोहोचू शकले. सर्व प्रवाशांना जैसलमेर येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. मात्र सर्वांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले असून ते सुखरूप आहेत, असे आर. एच. तडवी यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Gadkariनितीन गडकरी