शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नागपुरात एअर इंडियाचे आज, उद्या अतिरिक्त उड्डाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:55 IST

एअर इंडियाच्या एमआरओमध्ये नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी आलेल्या विमानाचे एआय १४६९ नागपूर-दिल्ली अतिरिक्त उड्डाण रविवार, २४ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असून दिल्लीला सकाळी १०.१५ वाजता पोहोचणार आहे.

ठळक मुद्देविमानांची एमआरओमध्ये देखभाल, दुरुस्ती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एअर इंडियाच्या एमआरओमध्ये नियमित देखभाल आणि दुरुस्तीसाठी आलेल्या विमानाचे एआय १४६९ नागपूर-दिल्ली अतिरिक्त उड्डाण रविवार, २४ रोजी सकाळी ८.३० वाजता होणार असून दिल्लीला सकाळी १०.१५ वाजता पोहोचणार आहे.विमानाचे संचालक बोईंग ७७७-२०० एलआरसह (लॉन्ग रेंज) करण्यात येणार आहे. विमानाने २४० दिवसांचे उड्डाण केल्यामुळे फेसचेक करणे अनिवार्य होते. एअर इंडियाच्या ताफ्यात या प्रकारची तीन विमाने आहेत. फेसचेक पाच दिवसांचे असते. या विमानाला एमआरओमध्ये दुरुस्तीनंतर पुन्हा अतिरिक्त उड्डाण म्हणून चालविण्यात येते.एमआरओमध्ये दुसरे विमान मुंबईहून २४ फेब्रुवारीला फेसचेक नियमित तपासणीसाठी येणार आहे. त्यानंतर हेच विमान एआय-१६२८ सोमवार, २५ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता नागपुरातून मुंबईला रवाना होईल. उड्डाण बोर्इंग ७७७-३०० ईआरसह (एक्सटेंडेड रेंज) होणार आहे. या विमानाचे उड्डाण २४० दिवस आणि दोन हजार तासांचे झाले आहे.कमी अंतरानंतरही जास्त भाडेनागपुरातील एमआरओमध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानाच्या अतिरिक्त उड्डाणाचे भाडे कमी अंतर असतानाही जास्त आकारण्यात येणार आहे. नागपूर ते मुंबईचे अंतर कमी आहे. त्यानंतरही ५२४० रुपये आणि दिल्ली-नागपूरचे भाडे ३०४९ रुपये आकारण्यात येणार आहे. जास्त बुकिंग असल्यामुळे कमी शुल्क आणि कमी बुकिंग असल्यामुळे जास्त शुल्क असल्याचे एअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले.सहा विमानांचे उशिरा लॅण्डिंगदेशाच्या अन्य शहरांमधून नागपुरात येणाऱ्या विमानांना २० मिनिटे ते दोन तासांपर्यंत उशीर झाला. त्यामुळे नागपुरातून अन्य शहरात जाणाऱ्या या विमानांच्या उड्डाणाला उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले.सकाळी इंडिगोचे बंगळुरू येथून नागपुरात सकाळी ७.४५ वाजता येणारे ६ई५०९ विमान १ तास १४ मिनिटे उशिरा अर्थात ८.५९ वाजता आले. जेट एअरवेजच्या मुंबई-नागपूर ९डब्ल्यू६८३ या विमानाला १९ मिनिटे उशीर झाला. तर इंडिगोचे ६ई४८२ मुंबई-नागपूर विमान सकाळी १० ऐवजी ३८ मिनिटे उशिरा १० वाजून ३८ मिनिटांनी पोहोचले. इंडिगो कंपनीचे ६ई९२६ कोलकाता-नागपूर विमान दुपारी २ वाजून ५० मिनिटांऐवजी २१ मिनिटे उशिरा ३.११ वाजता पोहोचले. तसेच इंडिगोचेच ६ ई४३६ इंदूर-नागपूर विमान तब्बल २ तास ४ मिनिटे उशिरा अर्थात सायंकाळी ७.५५ ऐवजी रात्री ९.५९ वाजता आले. याशिवाय एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई-नागपूर विमान रात्री ८.३५ ऐवजी १ तास ४४ मिनिटे उशिरा अर्थात रात्री १०.१९ वाजता पोहोचले.सहा विमाने नागपुरात उशिरा आल्यामुळे नागपुरातून अन्य शहरांमध्ये विमानांना उड्डाण भरण्यास उशीर झाला.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर