शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 09:18 IST

Ahmedabad Air India Flight AI171 Crash : अपघातग्रस्त विमानाचा पायलट अनुभवी असूनही त्यांना आपत्कालीन स्थितीत विमान उतरविण्यासाठी वेळच मिळाला नाही. ही घटना जर काही हजार फूट उंचीवर झाली असती, तर पायलटकडे अनेक पर्याय असते, असे मुंबईतील जेटफ्लीट एव्हिएशनचे संस्थापक व एव्हिएशन तज्ज्ञ शनिल देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

- फहीम खाननागपूर - अपघातग्रस्त विमानाचा पायलट अनुभवी असूनही त्यांना आपत्कालीन स्थितीत विमान उतरविण्यासाठी वेळच मिळाला नाही. ही घटना जर काही हजार फूट उंचीवर झाली असती, तर पायलटकडे अनेक पर्याय असते, असे मुंबईतील जेटफ्लीट एव्हिएशनचे संस्थापक व एव्हिएशन तज्ज्ञ शनिल देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते म्हणाले की, उड्डाणापूर्वी नेहमीच ‘अरायव्हल टेस्ट’ केली जाते. हे विमान सकाळीच दिल्लीहून अहमदाबादला पोहोचले होते. त्यामुळे हे टेस्टिंग झाले असणार. मात्र टेकऑफनंतर लगेचच काही तांत्रिक बिघाड झाला असावा.

विमान चालविणारे कॅप्टन सुमित सभरवाल यांच्याकडे ८२०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. उड्डाणानंतर अवघ्या एका मिनिटात, १:३९ वाजता त्यांनी  ‘मे डे’ कॉल दिला, पण त्यानंतर विमानाचा एटीसीशी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क तुटला. अशा स्थितीत विमान वाचविण्यासाठी सभरवाल  यांना फार काहीही करता येणे  शक्यच नव्हते. 

‘विमानाचे लँडिंग गिअर आत घेतले नव्हते’सर्वात धक्कादायक बाब म्हणजे टेकऑफ झाल्यानंतर ५ मिनिटे झाली, तरीही विमानाचे लँडिंग गिअर आत घेतले गेले नव्हते. हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणानंतर सामान्यतः १०–१५ सेकंदांच्या आत हे गिअर आत घेतले जातात. मात्र गिअर बाहेरच राहणे ही गंभीर तांत्रिक अडचण असू शकते. ही संपूर्ण घटना डीजीसीए (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन) आणि एएआय (एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया) यांच्या सखोल चौकशीचा विषय आहे असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादGujaratगुजरात