शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

उद्यापासून १४ एप्रिलपर्यंत कृषी ऊर्जा पर्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारच्या कृषी पंप वीज कनेक्शन धोरणाबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी महावितरणने १ मार्च ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्य सरकारच्या कृषी पंप वीज कनेक्शन धोरणाबाबत शेतकऱ्यांना माहिती व्हावी, यासाठी महावितरणने १ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत राज्यात कृषी ऊर्जा पर्व आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणचे म्हणणे आहे की, या धोरणाअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषी लाईनद्वारे दिवसा आठ तास वीज देणे, थकीत रकमेत सवलत देणे व पायाभूत यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल.

कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत जिल्ह्यात पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या अध्यक्षतेखाली कृषी वीज ग्राहकांचे संमेलन आयोजित केले जातील. यादरम्यान थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जाईल. नवीन ग्राहकांना कनेक्शन देण्याचे प्रमाणपत्र दिले जाईल. ग्राम विकास विभाग व जिल्हा परिषद यांच्यासोबत समन्वय साधून हे संमेलने आयोजित केली जातील. याच प्रकारे महिला सशक्तीकरण संकल्पने अंतर्गत ८ मार्च रोजी महिला दिवसानिमित्त थकबाकी भरणाऱ्या महिलांचा सत्कार केला जाईल. महिलांच्या नावावर वीज कनेक्शन देण्यास प्राधान्य दिले जाईल. महिला सरपंच, जनमित्र व कर्मचारी, अंगणवाडी सेविकांचाही सत्कार केला जाईल. या धोरणाच्या प्रचारासाठी जि.प., जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, बाजार आदी ठिकाणी होर्डींग व पोस्टर लावले जातील. गावा-गावांमध्ये प्रचार केला जाईल. सोबतच एसएमएस व सोशल मिडियाच्या माध्यमातूनही जागृती केली जाईल. बिलासंदर्भात आलेल्या तक्रारींचा निपटाराही केला जाईल.