शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

नागपुरातील अग्रवाल तिहेरी हत्याकांड : ज्यांनी वाचवले प्राण त्यांचाच घेतला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 18:19 IST

आरोपी मदन अग्रवाल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

ठळक मुद्देआणखी एक करुणाजनक पैलू उघड

नागपूर : पत्नी आणि मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या करणारा मदन अग्रवाल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून यापूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याच्या पत्नी आणि मुलांनी त्याचा जीव वाचवला होता. तो काळ बनून आपला जीव घेईल अशी या बिचाऱ्यांना त्यावेळी साधी कल्पनाही नव्हती. त्यांनी केलेली कृती त्यांच्यासाठीच जीवघेणी बनली आणि क्रूरकर्मा मदनने पत्नी व दोन मुलांची निर्घृण हत्या केली.

जरीपटक्यातील दयानंद पार्कजवळ घडलेल्या थरारक तिहेरी हत्याकांडातील हा करुणाजनक पैलू बुधवारी उघड झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी मदन अग्रवाल याने कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पहिल्या वेळी त्याने विषारी गोळ्या खाल्ल्या होत्या तर दुसऱ्या वेळी त्याने विष पिले. मात्र दोन्ही वेळेस कुटुंबियांनी त्याला तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्याचा जीव वाचला.

सोमवारी आणि मंगळवारी रात्रीच्या दरम्यान मदनने पत्नी किरण तसेच ऋषभ आणि टिया ऊर्फ तोषिता या तिघांची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली आणि स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार उघड झाल्यापासून परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे. दरम्यान, आज बुधवारी मेयो इस्पितळात या चौघांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबीयांजवळ व्यक्त करायचा हतबलता

कर्जात आकंठ बुडाल्यामुळे कर्जदार वसुलीसाठी तगादा लावत आहेत, त्यांनी जगणे हराम केले, असे मदन त्याच्या कुटुंबातील सदस्यांना सांगायचा, यातून कशाप्रकारे सुटका होईल अशी विचारणाही करायचा. शेवटी त्याने स्वतःच कुटुंबीयांसह स्वतःचाही खात्मा करून कर्जाच्या कटकटीतून आपली सुटका करून घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू