शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी विवाहनंतर वाजणार सनई चौघडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 20:44 IST

विवाह सोहळ्यांना तुळशी विवाहानंतर सुरुवात होणार आहे. येत्या दोन महिन्यात विवाहासाठी १४ मुहूर्त आहे. साक्षगंध आटोपून मुहूर्तांची वाट बघणाऱ्या लग्नघरात लगबग सुरु झाली आहे.

ठळक मुद्देदोन महिन्यात १४ विवाह मुहूर्त : मंगल कार्यालय झाले फुल्ल

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जून महिन्यापासून थांबलेल्या विवाह सोहळ्यांना तुळशी विवाहानंतर सुरुवात होणार आहे. येत्या दोन महिन्यात विवाहासाठी १४ मुहूर्त आहे. साक्षगंध आटोपून मुहूर्तांची वाट बघणाऱ्या लग्नघरात लगबग सुरु झाली आहे. विवाह सोहळ्यांसाठी मंगल कार्यालयांचे बुकिंगही फुल्ल झाले आहे.दोन मनांचे मिलन घडविणारा आणि दोन कुटुंबाना जोडणारा विवाह संस्कार सोहळा समीप आला आहे. तुळशी विवाहाला ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. १२ नोव्हेंबरला तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे. साधारणत: तुळशी विवाहाच्या मुहूर्तापासून विवाहांना सुरुवात केली जाते. त्या अनुषंगाने ९ नोव्हेंबरपासूनच लग्नाचा पहिला बार फुटणार आहे.गेल्यावर्षी गुरु अस्तामुळे एक महिना उशिराने लग्नसराई सुरू झाली होती. नागपुरातील प्रसिद्ध पंचांगानुसार नोव्हेंबर महिन्यात विवाहाचे ७ मुहूर्त असून मंगल कार्यालयांमध्ये बुकिंग आधीच करण्यात आले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन महिने मिळवून १४ शुभ मुहूर्त आहे. तसे वेगवेगळ्या पंचांगानुसार विवाहाचे मुहूर्त कमी जास्त आहे. डिसेंबरच्या १२ तारखेपासून गुरूचा अस्त असल्यामुळे थेट जानेवारीच्या १८ तारखेलाच विवाह मुहूर्त असल्याचे प्रसिद्ध ज्योतिष्याचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.त्या दृष्टिकोनातून शहरातील मंगल कार्यालय फुल्ल झाले आहे. शहरात साधारणत: दोनशेच्या जवळपास मंगल कार्यालय आहेत. लॉनचीही संख्या बरीच आहे. नोव्हेंबर ते एप्रिलपर्यंतचे बुकिंग झाले आहे. मे आणि जूनचे बुकिंग सध्या सुरू आहे, असे मंगल कार्यालयाचे मालक देवदत्त फडणवीस यांनी सांगितले. नागपूरच्या प्रसिद्ध पंचांगानुसार असे आहेत मुहूर्तनोव्हेंबर ९,१०,११,१४, २०,२३,२८डिसेंबर १,२,३,६,८,११,१२जानेवारी, १८,२०,२९,३०,३१फेब्रुवारी १,४,१२,१४,१६,१८,२६,२७मार्च ३,४,११,१२,१९एप्रिल १५,१६,२६,२७मे २,५,६,८,१२,१४,१८,१९,२४,जून १४,१५,२९,३०पुढे जुलै ते ऑक्टोबरपर्यंत मुहूर्त नसल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. शुभ मुहूर्त म्हणजे चांगली वेळविवाह मुहूर्तासाठी केवळ तारखेलाच महत्त्व नाही तर त्या दिवशीची वेळ कशी आहे याला महत्त्व असते. चंद्र, शुक्र, गुरु, बुध हे शुभ ग्रह आहे. त्यांची दिशा यावरून मुहूर्त ठरतो. विवाह मुहूर्तात जी घटिका काढली जाते, तिला महत्व असते. शास्त्रात मुहूर्ताचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तेव्हा पत्रिकेवर जी वेळ दिली आहे, ती वेळ प्रत्येकाने पाळल्यास, विवाहाचा शुभ सोहळा शुभ ठरतो, असे डॉ. अनिल वैद्य म्हणाले.

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूर