शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

महात्मा गांधीनंतर शेतकऱ्यांचे लोकनेते ठरले शरद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:04 IST

स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे जेवढे योगदान होते तेवढेच योगदान शरद जोशी यांचे शेतकरी चळवळीत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा महात्मा गांधीनंतर शरद जोशींना लोकनेता मानतो, अशी भावना ‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ पुस्तक प्रकाशनात मान्यवरांची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे जेवढे योगदान होते तेवढेच योगदान शरद जोशी यांचे शेतकरी चळवळीत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा महात्मा गांधीनंतर शरद जोशींना लोकनेता मानतो, अशी भावना ‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.हिंदी मोर भवनच्या अर्पण सभागृहात शेतकरी संघटनेच्यावतीने ‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी झाले. प्रकाशन समारंभाला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले उपस्थित होते. तसेच विदर्भवादी व शेतकरी नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, पुस्तकाचे लेखक भानु काळे, शेतकरी संघटन ट्रस्टचे रविभाऊ काशीकर, राम नेवले उपस्थित होते. यावेळी बोलताना रविभाऊ काशीकर म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांच्या मध्ये पडू नये. शेतकऱ्यांनी काय पिकवावे, काय पिकवू नये हे सरकारने सांगू नये. शरद जोशींनी आम्हा शेतकऱ्यांना चांगले शिकविले आहे. त्यामुळेच मला गांधींच्या आंदोलनात सहभागी होऊ न शकल्याची खंत होती. पण शरद जोशी यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचा आनंद आहे. यावेळी शैलजा देशपांडे म्हणाल्या की शेतकऱ्यांच्या महिलांना आंदोलनात नेतृत्व करण्याची संधी शरद जोशी यांनी दिली. महात्मा गांधीनंतर शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेली चळवळ ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी होती. प्रसंगी अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले की, शरद जोशी हे शेतकऱ्यांसाठी प्रवाहाविरुद्ध लढले, त्यामुळे ते लोकनेते ठरले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले की, शरद जोशींनी जे आंदोलन उभारले होते त्याची राजकारण्यांमध्ये धास्ती होती. देशातील राजकारण व अर्थकारणाला वळण देण्याचे काम जोशी यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन मंजुषा ठाकरे यांनी केले. आभार मदन कांबळे यांनी मानले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर