शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधीनंतर शेतकऱ्यांचे लोकनेते ठरले शरद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 00:04 IST

स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे जेवढे योगदान होते तेवढेच योगदान शरद जोशी यांचे शेतकरी चळवळीत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा महात्मा गांधीनंतर शरद जोशींना लोकनेता मानतो, अशी भावना ‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

ठळक मुद्दे‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ पुस्तक प्रकाशनात मान्यवरांची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींचे जेवढे योगदान होते तेवढेच योगदान शरद जोशी यांचे शेतकरी चळवळीत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी हा महात्मा गांधीनंतर शरद जोशींना लोकनेता मानतो, अशी भावना ‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन समारंभाला उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.हिंदी मोर भवनच्या अर्पण सभागृहात शेतकरी संघटनेच्यावतीने ‘अंगारवाटा : शोध शरद जोशींचा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मंगळवारी झाले. प्रकाशन समारंभाला अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले उपस्थित होते. तसेच विदर्भवादी व शेतकरी नेते माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, पुस्तकाचे लेखक भानु काळे, शेतकरी संघटन ट्रस्टचे रविभाऊ काशीकर, राम नेवले उपस्थित होते. यावेळी बोलताना रविभाऊ काशीकर म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांच्या मध्ये पडू नये. शेतकऱ्यांनी काय पिकवावे, काय पिकवू नये हे सरकारने सांगू नये. शरद जोशींनी आम्हा शेतकऱ्यांना चांगले शिकविले आहे. त्यामुळेच मला गांधींच्या आंदोलनात सहभागी होऊ न शकल्याची खंत होती. पण शरद जोशी यांच्या आंदोलनात सहभागी झाल्याचा आनंद आहे. यावेळी शैलजा देशपांडे म्हणाल्या की शेतकऱ्यांच्या महिलांना आंदोलनात नेतृत्व करण्याची संधी शरद जोशी यांनी दिली. महात्मा गांधीनंतर शरद जोशी यांनी शेतकऱ्यांसाठी राबविलेली चळवळ ही शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी होती. प्रसंगी अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले की, शरद जोशी हे शेतकऱ्यांसाठी प्रवाहाविरुद्ध लढले, त्यामुळे ते लोकनेते ठरले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. श्रीनिवास खांदेवाले म्हणाले की, शरद जोशींनी जे आंदोलन उभारले होते त्याची राजकारण्यांमध्ये धास्ती होती. देशातील राजकारण व अर्थकारणाला वळण देण्याचे काम जोशी यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन मंजुषा ठाकरे यांनी केले. आभार मदन कांबळे यांनी मानले.

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर