शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
3
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
4
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
5
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
6
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
7
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
8
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
9
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
10
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
11
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
12
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
13
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
14
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
15
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
16
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
17
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
18
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?
19
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
20
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?

पाच दिवसाच्या मुक्कामानंतर जय जगत : २०२० पदयात्रा सेवाग्रामकडे रवाना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 21:07 IST

पाच दिवसांच्या नागपूर मुक्कामानंतर जगाला न्याय व शांतीचा संदेश देण्यासाठी निघालेली ‘जय जगत : २०२०’ पदयात्रा सोमवारी सेवाग्रामकडे रवाना झाली.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी प्रतिनिधींना दिला प्रेमाचा निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाच दिवसांच्या नागपूर मुक्कामानंतर जगाला न्याय व शांतीचा संदेश देण्यासाठी निघालेली ‘जय जगत : २०२०’ पदयात्रा सोमवारी सेवाग्रामकडे रवाना झाली. मंगळवारी सायंकाळी ती बुटीबोरीला पोहचत असून मुक्कामानंतर आसोलामार्गे पुढील प्रवासासाठी रवाना होत आहे.नागपूरहून निघताना पदयात्रेला शालेय विद्यार्थ्यांनी पुढील प्रवासासाठी निरोप दिला. डोंगरगाव येथे पोहचल्यावर मेघे साई आयटीआयमध्ये या यात्रेचे स्वागत करण्यात आले. या ठिकाणी असलेले सर्वधर्मसमभावाचे मंदिर पाहून पदयात्रेतील प्रतिनिधींनी आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी प्रतिनिधींचे पुष्पहाराने आणि तिलक लावून मराठमोळ्या वेशात स्वागत केले. यावेळी राजगोपाल पी. व्ही. यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.राजघाट दिल्ली येथून २ ऑक्टोबरला ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत राजगोपाल पी. व्ही. यांच्या नेतृत्वात निघालेल्या या पदयात्रेत कॅनडा, केनिया, स्पेन, फ्रान्स, मेक्सिको, अर्जेंटिना, इटली यासह १२ देशातील प्रतिनिधी पायदळ चालत आहेत. विदेशातील १५ व भारतातील ३५ अशा ५० प्रतिनिधींचा यात सहभाग आहे.१५ जानेवारीला सायंकाळी ही पदयात्रा नागपूरला पोहचली होती. या पाच दिवसांच्या मुक्कामात या प्रतिनिधींनी दीक्षाभूमीला भेट दिली. यासोबतच शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीही संवाद साधला होता.पदयात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप ३० जानेवारीला सेवाग्राम येथे होत आहे. दुसरा टप्पा २७ सप्टेंबरला सुरू होऊन २ ऑक्टोबरला जिनेव्हा येथे समारोप होईल.

टॅग्स :nagpurनागपूर