शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

निवडणुकीनंतर राफेल घोटाळ्याची चौकशी होणार; राहुल गांधींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 19:34 IST

चीनमध्ये मेड इन विदर्भ दिसेल. विदर्भाला आम्ही सिंगापूर, दुबई सारखे हब बनवू इच्छित होतो. पण यांनी कामच केले नाही, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर राफेलसारख्या घोटाळ्यांची चौकशी होईल. मोदींनी प्रक्रियाच नष्ट केली. कारवाई तर होणारच. घोटाळा कुणी केला हे पर्रिकर यांना माहीत होते. चीनमध्ये मेड इन विदर्भ दिसेल. विदर्भाला आम्ही सिंगापूर, दुबई सारखे हब बनवू इच्छित होतो. पण यांनी कामच केले नाही, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.

 नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या मतदारसंघात कस्तुचंद पार्कवर राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा, अंबानी कनेक्शन आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सडकून टीका केली. 

अनिल अंबानींचं ४५ हजार कोटींचं कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ का करत नाही? असा सवाल करत त्यांनी ज्या कंपनीला विमान बनवण्याचा काहीही अनुभव नाही, ज्याच्याकडे पाच पैसेसुद्धा नाहीत त्यांना मोदी सरकारने राफेलचं कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप केला. तसेच या घोटाळ्यांची चौकशी करण्याचा इशाराही राहुल यांनी दिला. 

तसेच गरिबीवर काँग्रेस पक्षाचा सर्जीकल स्ट्राईक आहे. भारतातील गरीब २०% नागरिकांना म्हणजेच ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी नागरिकांच्या खात्यात वर्षाला ७२००० रुपये जमा करणार. ही योजना आपण देशाच्या अर्थतज्ज्ञांसोबत मिळून बनविल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वासन देतात, आम्ही काम करतो. 72000 रुपयांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होणार नाही. मी लोकांसोबत दूरपर्यंतचे संबंध बनवायला आलो आहे. मी 2-3 दिवसांसाठी राजकारण करायला आलेलो नाही. देशात 12 हजार रुपये प्रति महिने मिळकत झालीच पाहिजे. आम्ही गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करणार. अर्जुनासारखे माझे लक्ष्य ठरले आहे. 20 टक्के गरीब लोकांना 5 वर्षात 3 लाख 60 हजार देणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आपला देश बंधुभावाचा आहे. हिंसा करा असे कुठेच लिहिले नाही. गीतेत पण नाही. पण मोदी केवळ द्वेषाची भाषा बोलतात. अडवाणी हे गुरू होते, त्यांची अवस्था पहा . हा हिंदू धर्म आहे का ? मी जे म्हणतो ते मनापासून म्हणतो. आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. देशातून गरिबी नेहमीसाठी हटविल. देश चीनसोबत स्पर्धा करू शकतो. खोटं ऐकलं,  आता सत्य ऐका. अडवाणी यांची हालत पहा, गुरुस्थानी आहेत, पण दुर्लक्षित ठेवले आहे, असा आरोपही त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर केला. तसेच महिलांना शक्ती देणार. 33 टक्के आरक्षण देणार विधिमंडळ व संसदेत. महिलांना नोकरीमध्ये 33 टक्के आरक्षण मिळणार, असे आश्वासन दिले. 

यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भाषणे झाली. राहुल गांधी हे देशाचे खरे शिपाई. मोदी सरकारच्या काळात सर्व काळा पैसा गुजरातमध्ये गेला. राफेलची फाईल दाबून ठेवली. सौगंध मुझे अंबानी की, मै फाईल नही मिलने दुंगा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मोदींवर टीका केली. 

तर देशात 5 वर्षात शेतकरी, व्यापारी संकटात. बेरोजगारी वाढली. भाजपचे लोकांना सत्तेची धुंदी चढली आहे . देशाचा भ्रमनिरास झाला आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीnagpur-pcनागपूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीNana Patoleनाना पटोलेRafale Dealराफेल डील