शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

लवादाच्या निर्णयानंतर ग्राहक मंचमध्ये तक्रार अस्वीकार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:08 IST

लवादाने दिलेला निर्णय उभयपक्षांना बंधनकारक असतो. त्यामुळे आधी लवाद प्रक्रियेचा अवलंब झाल्यानंतर ग्राहक मंचमध्ये दाखल करण्यात आलेली तक्रार स्वीकारली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देग्राहक मंचचा निर्णयलवादाचा निर्णय पक्षकारांना बंधनकारक असल्याचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लवादाने दिलेला निर्णय उभयपक्षांना बंधनकारक असतो. त्यामुळे आधी लवाद प्रक्रियेचा अवलंब झाल्यानंतर ग्राहक मंचमध्ये दाखल करण्यात आलेली तक्रार स्वीकारली जाऊ शकत नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच एका प्रकरणात दिला.संबंधित प्रकरणावर मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. जाफर अहमद सय्यद व टाटा मोटर्स फायनान्स यांच्यामधील कर्ज करारानुसार कर्जाचा वाद निकाली काढण्यासाठी लवाद प्रक्रियेचा अवलंब करण्यात आला होता. लवादाचा निर्णय विरोधात गेल्यानंतर सय्यद यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने वरीलप्रमाणे निर्णय देऊन त्यांची तक्रार फेटाळून लावली. तक्रारीनुसार, सय्यद यांनी वाहन खरेदी करण्यासाठी टाटा मोटर्सकडून ३ लाख ९२ हजार रुपये कर्ज घेतले होते. ८९ हजार रुपये स्वत:जवळचे दिले होते. करारानुसार, कर्जाची रक्कम ११ एप्रिल २०१६ पर्यंत ४७ मासिक हप्त्यामध्ये परत करायची होती. सय्यद यांनी २३ सप्टेंबर २०१५ पर्यंत ४ लाख ६६ हजार ३५३ रुपये परत केले. त्यानंतर कर्जाचे केवळ ४५ हजार ९६७ रुपये शिल्लक असताना कंपनीने ११ डिसेंबर २०१५ रोजी वाहन जप्त केले. परिणामी, सय्यद यांनी ५ फेब्रुवारी २०१६ रोजी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली, पण कंपनीने त्याला प्रतिसाद दिला नाही. तसेच, सय्यद यांना कर्जाची रक्कम व वाहन यापैकी काहीही दिले नाही. त्यामुळे त्यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल करून कर्जाची रक्कम, भरपाई इत्यादीसह एकूण ९ लाख ५५ हजार ३५३ रुपयाची मागणी केली होती.असे होते कंपनीचे उत्तरकंपनीने मंचमध्ये लेखी उत्तर दाखल करून सय्यद यांचे सर्व आरोप फेटाळून लावले व विविध मुद्यांच्या आधारे स्वत:च्या कारवाईचे समर्थन केले. कर्ज करारानुसार हे प्रकरण आधी लवादापुढे ठेवण्यात आले होते. लवादाने कंपनीला वाहनाचा ताबा घेण्याची परवानगी दिली होती. तसेच, सय्यद यांनी २ लाख १५ हजार ८७४ रुपये १८ टक्के व्याजासह कंपनीला अदा करावे असा अंतिम आदेश दिला. सय्यद यांनी ही बाब मंचपासून लपवून ठेवली असे कंपनीने सांगितले.

टॅग्स :consumerग्राहक