शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

सहप्रवाशाच्या मृत्यूनंतर ‘त्यांनी’ही सोडला प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:44 AM

मुंबई-हावडा मेलने एकमेकांशी अनोळखी असलेले दोन प्रवासी हावडाकडे प्रवास करीत होते. रेल्वेच्या एकाच कोचमध्ये ते बसले होते. त्यांची आपसात बातचीतही झाली नाही. त्यातील एकाचा अचानक मृत्यू झाला. दुसऱ्या प्रवाशाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांचीही प्रकृती बिघडली आणि त्यांनीही प्राण सोडला. एकाच प्रवासातील दोघांचा असा मृत्यू झाल्याच्या घटनेने या कोचमधील प्रवाशांनीही हळहळ व्यक्त केली.

ठळक मुद्देमुंबई-हावडा मेलमधील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : मुंबई-हावडा मेलने एकमेकांशी अनोळखी असलेले दोन प्रवासी हावडाकडे प्रवास करीत होते. रेल्वेच्या एकाच कोचमध्ये ते बसले होते. त्यांची आपसात बातचीतही झाली नाही. त्यातील एकाचा अचानक मृत्यू झाला. दुसऱ्या प्रवाशाला त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाली. त्यांचीही प्रकृती बिघडली आणि त्यांनीही प्राण सोडला. एकाच प्रवासातील दोघांचा असा मृत्यू झाल्याच्या घटनेने या कोचमधील प्रवाशांनीही हळहळ व्यक्त केली.चिन्मय दास (७३) असे एका मृत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. दास यांना कॅन्सर होता. मुंबईत उपचार घेतल्यानंतर ते पत्नी आणि जावयासह हावडाला जात होते. दुसरा मृत ४० वर्षे वयोगटातील आहे. दोघेही १२८०९ मुंबई-हावडा मेलच्या एस ३ कोचने प्रवास करीत होते. कोचमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी मृत आजारी होता. सकाळी तो शौचालयाच्या दिशेने गेला. त्याला उलटी झाली आणि शौचालयाच्या गेटसमोरच तो पडला. इतर प्रवाशांनी त्याला उठविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. याची माहिती रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला देण्यात आली. नियंत्रण कक्षाने लोहमार्ग पोलिसांना सूचना दिली. इकडे प्रवाशाचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती दास यांच्या कानावर पडली. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली. गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचण्यापूर्वीच लोहमार्ग पोलीस, आरपीएफ जवान प्लॅटफॉर्मवर पोहोचले. पंचनामा करीत असताना दास यांची प्रकृती आणखीनच ढासळली. मृत प्रवाशाला गाडीखाली उतरविण्यात आले. दास यांनाही खाली उतरविण्यात आले. त्यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपास हवालदार संजय पटले करीत आहेत.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीDeathमृत्यू