शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

मिठाईतील भेसळीचा लोकांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 12:56 AM

काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करुन लोकांच्या जीवाशी खेळतात. हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात अन्न व प्रशासन विभाग अपयशी ठरला आहे.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी : ग्राहकांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सणासुदीच्या काळात दूध, खवा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करुन लोकांच्या जीवाशी खेळतात. हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात अन्न व प्रशासन विभाग अपयशी ठरला आहे. मोहिमेअभावी हॉटेलचालक मस्त आहेत. भेसळखोरांवर कारवाई करून कठोर शिक्षा करावी, असा सूर अनेकांनी लोकमतशी बोलताना काढला.अन्न सुरक्षा कायद्यातील मानांकनानुसार अन्नाची गुणवत्ता तपासण्यात येते. या मानांकनाचे पालन होते की नाही, हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध पद्धती अवलंबून त्या निकषांवर चाचण्या येतात. पूर्वी धडक मोहिमांमुळे भेसळ करणाऱ्यांवर चाप बसला होता. पण आता हॉटेलचालकांवर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.भेसळखोरांना लगाम लावणे अशक्यग्राहक महेंद्र आदमने म्हणाले, सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणारे आणि तयार करणाऱ्यांची चलती असते. पैशाच्या लालसेपोटी जीवाशी खेळणाऱ्या या समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ तयार करणारे व विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असते. परंतु कारवाईबाबत उदासीन धोरण असते. विभागाने नियमितपणे अशा भेसळखोरांवर लक्ष ठेवून कारवाई करावी. भेसळखोरांना रोखण्यासाठी प्रशासनाबरोबर नागरिकांनीही सतर्क राहिले पाहिजे.इच्छाशक्तीचा अभावभाऊ पत्की म्हणाले, अन्न व औषध प्रशासन खात्यात पुरेसे मनुष्यबळ नाही आणि काम करण्याची जबर इच्छाशक्ती नसल्यामुळे कारवाई होत नाही. होते ती नगण्यच असते. भेसळयुक्त खाद्यपदार्थाबरोबरच दूध भेसळही नित्याची बाब आहे. अशा कारवाईच्या उपाययोजना करताना कायमस्वरूपी भरारी पथके स्थापन व्हावीत. न्यायालयानेही अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी.शोधमोहिम राबवावीपंकज गाडे म्हणाले, कायद्यानुसार भेसळ हा गुन्हा असतानाही व्यापारी सणासुदीच्या काळात अन्नात भेसळ करतात. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. अन्न विषबाधेची घटना घडली की, हॉटेलवर धाड पडते आणि भेसळयुक्त पदार्थ जप्त होतात. मात्र, या धाडी अगोदरपासून पडायला हव्यात. त्यासाठी अन्नपदार्थ भेसळ शोधमोहिम अखंड राबवणे गरजेचे आहे.

ग्राहकांनीही सतर्क राहावेअशोक शेंडे म्हणाले, भेसळ करणाऱ्यांवर अंकुश ठेवायला हवा. प्रत्येक सणांमध्ये मिठाई व गोड पदार्थांची मोठी मागणी असते. प्रशासनाच्या संबंधित खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपापले कर्तव्य पद्धतशीर काटेकोरपणे व शिस्तीने बजावल्यास भेसळ माफियांवर वचक बसेल.कायमस्वरूपी यंत्रणा हवीविश्वास क्षीरसागर म्हणाले, अन्नपदार्थात कुठली ना कुठली भेसळ असल्याने त्याचे विपरीत परिणाम कालांतराने शरीरावर होताना दिसतात. भेसळमाफियांना शासकीय यंत्रणेची भीती राहिलेली नाही. भेसळ रोखण्यासाठी एक कायमस्वरूपी विशेष यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे. भेसळखोरांना अटकाव करण्यासाठी त्यांना फासावर लटकविणेच उचित ठरेल.विभागातर्फे नियमित कारवाईअधिकाऱ्यांनी सांगितले की, अपुरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यानंतर विभागातर्फे नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येते. सणासुदीत हॉटेलमधील मिठाई आणि खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. विश्लेषणाच्या आधारावर कारवाई करून दंड आकारण्यात येतो. अन्न मानके कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये शिक्षेची तरतूद आहे. ग्राहकांनी दक्ष राहून भेसळ करणाऱ्याविरुद्ध विभागाकडे तक्रार नोंदविता येते.

टॅग्स :hotelहॉटेलFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग