शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

नागपुरात उपद्रवी वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:20 IST

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रॅलीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घालू पाहणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४५ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

ठळक मुद्देवाहतूक शाखेची विशेष मोहीम : ११६ वाहनेही ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रॅलीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घालू पाहणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४५ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शहरातील विविध मार्गावर उपद्रवी वाहनचालक आरडाओरड करून गोंधळ घालतात. वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघातही होतात.फुटाळा परिसरात तर त्यांचा हैदोसच असतो. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करता यावा आणि या राष्ट्रीय सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून, उपद्रवी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते. त्यानुसार, उपद्रवी वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी १४ आॅगस्टच्या सायंकाळपासूनच विशेष मोहीम राबविण्यात आली.या विशेष मोहिमेंतर्गत पोलिसांनी ट्रीपल सीट दुचाकी चालविणारे २५५, राँग साईड वाहन चालविणे ५४, दारूच्या नशेत वाहन चालविणे ४९, बेदरकारपणे वाहन चालविणे १७ तसेच नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या २७१ जणांवर कारवाई केली. ९१४ वाहनचालकांना जागच्या जागी चालान देण्यात आले. तर सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे सिग्नल तोडून पळणाऱ्या २०२१ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले. १७१० वाहनचालकांवर फोटोच्या आधारे (सिग्नलवर फोटो काढून) फोटो ई-चालान कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ४६४५ वाहनचालकांवर वेगवेगळी कारवाई करण्यात आली. कागदपत्रे न बाळगणाऱ्या ११६ चालकांकडून त्यांची वाहने तात्पुरती ताब्यात घेण्यात आली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर