शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

नागपुरात उपद्रवी वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 01:20 IST

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रॅलीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घालू पाहणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४५ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.

ठळक मुद्देवाहतूक शाखेची विशेष मोहीम : ११६ वाहनेही ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रॅलीच्या नावाखाली रस्त्यावर गोंधळ घालू पाहणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४६४५ वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. शहरातील विविध मार्गावर उपद्रवी वाहनचालक आरडाओरड करून गोंधळ घालतात. वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे अपघातही होतात.फुटाळा परिसरात तर त्यांचा हैदोसच असतो. स्वातंत्र्यदिनाचा सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा करता यावा आणि या राष्ट्रीय सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून, उपद्रवी वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना देण्यात आले होते. त्यानुसार, उपद्रवी वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी १४ आॅगस्टच्या सायंकाळपासूनच विशेष मोहीम राबविण्यात आली.या विशेष मोहिमेंतर्गत पोलिसांनी ट्रीपल सीट दुचाकी चालविणारे २५५, राँग साईड वाहन चालविणे ५४, दारूच्या नशेत वाहन चालविणे ४९, बेदरकारपणे वाहन चालविणे १७ तसेच नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणाऱ्या २७१ जणांवर कारवाई केली. ९१४ वाहनचालकांना जागच्या जागी चालान देण्यात आले. तर सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे सिग्नल तोडून पळणाऱ्या २०२१ वाहनचालकांना ई-चलान पाठविण्यात आले. १७१० वाहनचालकांवर फोटोच्या आधारे (सिग्नलवर फोटो काढून) फोटो ई-चालान कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ४६४५ वाहनचालकांवर वेगवेगळी कारवाई करण्यात आली. कागदपत्रे न बाळगणाऱ्या ११६ चालकांकडून त्यांची वाहने तात्पुरती ताब्यात घेण्यात आली.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर