शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नागपुरात ६७१ स्कूल वाहन चालकांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 23:34 IST

क्षमतेपेक्षा अधिक मुलांना वाहनात बसवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी अभियान राबवित पहिल्याच दिवशी ६७१ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी वाहन चालकविरुद्ध चालानची कारवाई केली तसेच त्यांना असे न करण्याची ताकीदही दिली.

ठळक मुद्देक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी : वाहतूक पोलिसांचे विशेष अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : क्षमतेपेक्षा अधिक मुलांना वाहनात बसवणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी अभियान राबवित पहिल्याच दिवशी ६७१ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली. पोलिसांनी वाहन चालकविरुद्ध चालानची कारवाई केली तसेच त्यांना असे न करण्याची ताकीदही दिली.शाळेतील मुलांची वाहतूक करणाऱ्या  वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवले जाते. त्यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. शाळा संचालक आणि वाहन चालकांना वेळोवेळी याबाबत आवश्यक दिशानिर्देशही देण्यात आले होते. यानंतरही क्षमतेपेक्षा जास्त मुलांना बसवणे कमी झाले नाही. त्यामुळे बुधवारी वाहतूक पोलिसांनी स्कूल वाहनाविरुद्ध विशेष अभियान सुरू केले. या अभियानात शिक्षण संस्थांजवळ आणि रस्त्यांवर वाहनांना थांबवून तपासणी करण्यात आली. एखाद दुसरे वाहन सोडले तर बहुतांश स्कूल वाहनांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले. अनेक वाहनांमध्ये तर क्षमतेपेक्षा दुप्पट मुलं बसवण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी चालकांविरुद्ध चालानची कारवाई केली.वाहतूक पोलिसांनी सकाळपासूनच मोर्चा सांभाळला. वाहन चालकांनासुद्धा या कारवाईची माहिती मिळाली. ते कारवाईपासून वाचण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करू लागले. परंतु वाहतूक पोलिसांनी शिक्षण संस्थांजवळ सुद्धा जाळे पसरविले होते. त्यामुळे दोषी वाहन चालक कारवाईपासून वाचू शकले नाही. या मोहिमेत आॅटो, व्हॅन आणि बस चालक सर्वाधिक प्रभावित झाले. वाहतूक पोलिसांनी सायंकाळपर्यंत ६७१ वाहन चालकांविरुद्ध कारवाई केली.उशिरा पोहोचले विद्यार्थीकारवाईपासून वाचण्यासाठी अनेक वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर केला. त्यानंतरही ते पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास वेळ लागला. काही विद्यार्थ्यांनी पालकांना फोन करून उशिरा पोहोचल्याची तक्रारही केली.सायकल रिक्षांकडे होते दुर्लक्षकाही ठिकाणी सायकल रिक्षाने सुद्धा मुलं शाळेत जातात. त्यात सुद्धा मुलांना कोंबले जाते. शहरातील अनेक भागात हे चित्र पाहायला मिळते. परंतु सायकल रिक्षाविरुद्ध कुठलीही कारवाई केली जात नाही. इतर वाहनांच्या तुलनेत सायकल रिक्षाचे अपघात कमी होतात. परंतु सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही.पालकांना सहकार्य करण्याचे आवाहनही मोहीम यापुढेही सुरू राहील. वाहनचालक क्षमतेपेक्षा अधिक मुलांना वाहनात बसवून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. मुलांच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. ज्यांच्याविरुद्ध चालानची कारवाई करण्यात आली त्यांच्यात बदल झाल्याचे आढळून न आल्यास येण्याऱ्या दिवसात कठोर कारवाई केली जाईल. वाहनचालकांशिवाय शिक्षण संस्थांवरही मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांनी स्वत: यादिशेने पुढाकार घ्यायला हवा. त्याचप्रकारे पालकांनीसुद्धा आपली जबाबदारी पार पाडीत ज्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मुलं असतील त्या वाहनात आपल्या मुलांना पाठवू नये. या अभियानात पालकांनी सहकार्य करावेउपायुक्त रवींद्र परदेशीवाहतूक पोलीस

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर