शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेतील ३ हजारांवर फेरीवाल्यांवर कारवाईचा दंडूका; RPF ची कारवाई, राज्यभरात २४ हजारांवर गुन्हे दाखल

By नरेश डोंगरे | Updated: December 25, 2023 18:44 IST

आरडाओरडीमुळे प्रवासी रेल्वेगाड्यात लांब अंतराचा प्रवास करताना निट आरामही करू शकत नाहीत.

नागपूर : मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) कारवाईचा दंडूका चालविला आहे. नागपूर विभागात गेल्या आठ महिन्यात तब्बल ३१७९ फेरीवाल्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आकडा २४,३३९ एवढा आहे. रेल्वेगाडीत चढून आरडाओरड करीत खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. जवळपास प्रत्येकच रेल्वेगाडीत त्यांचा सकाळपासून रात्रीपर्यंत धुमाकूळ सुरू असतो.

त्यांच्या आरडाओरडीमुळे प्रवासी रेल्वेगाड्यात लांब अंतराचा प्रवास करताना निट आरामही करू शकत नाहीत. प्रवाशांच्या सारख्या वाढत्या तक्रारीमुळे रेल्वे प्रशासनाने या फेरीवाल्यांना आवरण्याची जबाबदारी आरपीएफवर सोपविली. त्यानुसार, आरपीएफने मध्य रेल्वेच्या पाचही विभागात धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमधील फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका लावला. त्यानुसार गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत आरपीएफने नागपूर विभागात फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका लावला. तब्बल ३१८१ गुन्हे दाखल करून ३१७९ फेरीवाल्यांना अटक करण्यात आली. मध्य रेल्वेच्या पाचही विभागातील फेरीवाल्यांवर कारवाईचा आकडा मोठा आहे. पाच विभागात एकूण २४,३३९ गुन्हे दाखल करून आरपीएफने २४,३३४ फेरीवाल्यांना अटक केली. त्यांच्याकडून ३.५ कोटी रुपये दंडही वसूल करण्यात आला. कारवाईची विभागनिहाय माहिती

  • मुंबई विभागात ९३९४ गुन्ह्यांची नोंद, ९३९३ जणांना अटक आणि १.०२ कोटी रुपये दंड वसूल 
  • भुसावळ विभागात ७२०६ गुन्हे दाखल, ७२०५ लोकांना अटक आणि १.२९ कोटींचा दंड वसूल
  • पुणे विभागाच्या आरपीएफने १९९० गुन्हे दाखल करून १९९१ लोकांना अटक केली. त्यांच्याकडून १३.८८ लाख दंड वसूल
  • आरपीएफ सोलापूर विभागाने २५६८ गुन्हे दाखल करून २५६६ लोकांना अटक केली. त्यांच्याकडून २५.८७ लाख रुपये दंड वसूल 
टॅग्स :nagpurनागपूरrailwayरेल्वे