शहरं
Join us  
Trending Stories
1
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
2
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
3
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
4
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
5
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
6
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
7
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
8
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
9
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
10
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
11
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
12
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
13
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
14
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
15
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
16
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
17
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
18
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
19
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
20
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

तर्काच्या आधारे आरोपीचे स्वातंत्र्य हिरावू शकत नाही- उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:20 IST

तसेच, रेकॉर्डवर एकही ठोस पुरावा नसल्याची बाब लक्षात घेता संबंधित आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका फौजदारी प्रकरणात राज्य सरकारचे कान टोचले. केवळ तार्किक मुद्द्यांच्या आधारावर कोणत्याही आरोपीचे स्वातंत्र्य हिरावले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने सरकारला परखडपणे सांगितले. तसेच, रेकॉर्डवर एकही ठोस पुरावा नसल्याची बाब लक्षात घेता संबंधित आरोपीला सशर्त जामीन मंजूर केला.

न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व वाल्मीकी मेनेझेस यांनी हा निर्णय दिला. राज्य सरकारने हत्या प्रकरणातील आरोपी कुंदन विनोद मेश्राम (२५) याला जामीन देण्यास विरोध केला होता. साक्षीदारांच्या जबाबानुसार, मेश्राम व त्याचा साथीदार दुचाकीवर बसून गेले होते. त्यांच्याकडे शस्त्रे होती. त्यानंतर मेश्रामच्या शर्टवर रक्ताचे डाग आढळून आले, असे सरकारचे म्हणणे होते. परंतु, पोलिसांना आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे मिळून आली नाहीत. मेश्रामला गुन्हा दाखल केल्यानंतर लगेच अटक करण्यात आली, पण त्याची ओळख परेड घेण्यात आली नाही. तसेच, पंचनाम्यामध्ये त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते, याचा उल्लेख नाही. घटनेचा कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारही नाही. त्यामुळे न्यायालयाने सरकारचे मुद्दे तार्किक असल्याचे सांगून या आधारावर आरोपीला कारागृहात ठेवले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. 

यवतमाळमधील घटनाही यवतमाळमधील घटना असून आरोपींविरुद्ध अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी १४ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री पोलिस कॉन्स्टेबल निशांत खांडसे यांची हत्या केल्याची तक्रार आहे. सत्र न्यायालयाने १५ एप्रिल २०२३ रोजी मेश्रामचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मेश्रामतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले. 

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर