शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

भावनेचे संचित संहिता, मृत्यूसवे होतील अदृश्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:09 IST

नागपूर : तत्त्वज्ञान, संशोधन, सौंदर्यशास्त्र, इतिहास अशा कितीतरी साहित्य प्रकारांनी भारत संपन्न आहे. मात्र, त्यांचे लिखित संकलन करण्याची वृत्ती ...

नागपूर : तत्त्वज्ञान, संशोधन, सौंदर्यशास्त्र, इतिहास अशा कितीतरी साहित्य प्रकारांनी भारत संपन्न आहे. मात्र, त्यांचे लिखित संकलन करण्याची वृत्ती नसल्याने म्हणा वा कुणाचे लिखित दस्तावेज संवर्धित करण्यासंदर्भात उदासीनता असल्याने, आपण आपल्या साहित्य संपदेपासून अलिप्त राहिलो आहोत. आज जे प्राचीन भारतीय लिखित दस्तावेज उपलब्ध आहेत, ते एकूण दस्तावेजाच्या धड १० टक्केही नसल्याचे सांगितले जाते. यावरून आपणा भारतीयांच्या साहित्य संवर्धनासंदर्भातील कफल्लक वृत्तीची कल्पना येते. हीच वृत्ती आजही असल्याने, बऱ्याच लेखकांनी केलेले संशोधन, लिहिलेले नाट्य, काव्य, कथा अडगळीत पडल्या आहेत. हे सगळे साहित्य लेखकाच्या मृत्यूसवे चिताग्नीवर अदृश्य होणार आहे.

जगात अभिव्यक्तीला दुष्काळ नाही. मात्र, ज्या तऱ्हेचे प्रेम आपल्या साहित्यावर जगातील काही देशांचे दिसून येते, तसे आपल्याकडे नाही हे दुर्दैव आहे. त्याचाच परिणाम अभिव्यक्तीला कुठलीच मर्यादा नसली तरी लेखक वाचकांपर्यंत पोहोचण्याला लगाम आहे. मुळात ही लेखक व ग्रंथ प्रकाशक यांच्यातील भल्यामोठ्या अंतराची समस्या आहे. त्यातही काळाच्या ओघात आणि व्यावसायिकतेच्या जोखडात प्रकाशकांना अनेक अडचणी आहेत. लेखक हा मुळात मनस्वी असल्याने आणि ग्रंथ प्रकाशन ही आर्थिक बाब असल्याने स्थळ, काळ, परिस्थितीनुसार तो धजावत नाही. त्यातच साहित्यासंदर्भातील शासकीय संस्था, विभाग, शासन अनुदानित संघटना, महामंडळे खुर्ची तोडण्याचेच काम करतात. त्याचा परिणाम पुन्हा एकदा आपल्या ऐतिहासिक उदासीन वृत्तीचीच पुनरावृत्ती होत असल्याचे दिसून येते. वर्तमानात प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेली साहित्य निर्मिती अडगळीत आहे. दुर्लक्षित अवशेषांचे रडगाणेच त्या संहितांच्या नशिबी आहे. संहितांचा जन्मदाता सरणावर जाणार तेव्हा त्या संहिता अनाहुत भस्म होणार आहेत.

* तुम्ही यावे आमच्या दारी

शासनाकडून साहित्य प्रकाशनाबाबत अनुदान दिले जाते. कामगार कल्याण मंडळ, साहित्य महामंडळ, मराठी-हिंदी भाषा विभाग अशा अनेक संस्थांद्वारे हे अनुदान साहित्य प्रकाशनासंदर्भात मिळते. मात्र, या संस्थांची पोहोच अजूनही तळागाळात नाही, हे वास्तव आहे. या संस्था, मंडळांवर असणारे पदाधिकारी स्वत:च्याच आविर्भावात असतात. ग्रामीण, नवोदित लेखकांकडे ते तुसड्या भावनेनेच बघतात. या संस्था, मंडळे त्यांना ‘तुम्ही यावे आमच्या दारी, तुम्ही नसतेच कारभारी’ अशा तऱ्हेने वागवत असतात. त्यामुळे, उपेक्षित लेखक त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत.

* संस्थांकडेही संहिता धूळखात

संस्था, मंडळांकडून दरवर्षी साहित्य निर्मितीबाबत स्पर्धांचे आयोजन होत केले जाते. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात नाट्य, काव्य, कथा आदींच्या संहिता जमा होतात. स्पर्धा आटोपली, पुरस्कारांचे वाटप झाले की त्या सर्व संहिता धूळखात पडल्या असतात. किमान त्या संहितांच्या प्रकाशनाबाबत पुढाकार घेण्याची वृत्ती त्यांची नसते.

.........