शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सौदी अरेबियात घडला अपघात : मृत मुलाच्या पार्थिवाची कुटुंबीयांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 21:43 IST

सौदी अरेबियातील दम्माम येथे कमर्शियल शीपवर झालेल्या अपघातात नागपुरातील एका युवकाचा मृत्यू झाला. अपघाताला आठ दिवस लोटूनही त्याचा मृतदेह अद्याप कुटुंबीयांना मिळाला नाही. त्यामुळे मुलाच्या पार्थिवासाठी वडिलांनी सौदी अरेबिया व भारत सरकारला साद घातली आहे. मात्र चौकशीच्या नावावर सौदी अरेबियाने पार्थिव परत दिलेले नाही.

ठळक मुद्देवडिलांची सरकारला साद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौदी अरेबियातील दम्माम येथे कमर्शियल शीपवर झालेल्या अपघातात नागपुरातील एका युवकाचा मृत्यू झाला. अपघाताला आठ दिवस लोटूनही त्याचा मृतदेह अद्याप कुटुंबीयांना मिळाला नाही. त्यामुळे मुलाच्या पार्थिवासाठी वडिलांनी सौदी अरेबिया व भारत सरकारला साद घातली आहे. मात्र चौकशीच्या नावावर सौदी अरेबियाने पार्थिव परत दिलेले नाही.लव शर्मा असे मृत युवकाचे नाव आहे. राजीव शर्मा त्याचे वडील आहेत. ते क्लार्क टाऊन येथे राहतात. लव हा सौदी अरेबिया येथील दम्मामच्या बहारी ड्राय बल्क कंपनीत मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होता. या कंपनीने लव शर्माला नियुक्त केले होते. बहारी बल्क या जहाजावर लव शर्मा १८ नोव्हेंबर २०१८ पासून कार्यरत होता. दरम्यान दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी जहाजावरील कार्गो एरियात कंटेनर लोडिंग करीत असताना अपघात झाला. त्यात लव शर्मा याच्यासह दोघेजण गंभीर जखमी झाले. त्या तिघांनाही सौदी अरेबियातील रूग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेची माहिती नागपुरातील शर्मा कुटुंबीयांना सौदी अरेबियातील कंपनीने दिली. तरुण मुलाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याचे कळताच शर्मा कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. लव हा या कुटुंबाचा थोरला मुलगा आहे. मर्चंट नेव्हीत करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. मुंबईतील कंपनीमार्फत त्याला सौदी अरेबियात नोकरी मिळाली होती. त्यामुळे शर्मा कुटुंबीय आनंदात होते. मात्र, अचानक लव शर्मावर काळाने झडप घातली.मुलाच्या मृत्यूने हादरलेल्या शर्मा कुटुंबीयांना मुंबईतील कंपनी लव शर्माचे पार्थिव मुंबईत आणणार असल्याचे कळविले होते. त्यासाठीचा सर्व खर्च व प्रशासकीय प्रक्रिया कंपनीकडून करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे राजीव शर्मा हे मुंबईत दाखल झाले. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून ते मुंबईत मुलाच्या पार्थिवाची प्रतीक्षा करीत आहे. सौदी अरेबियाच्या सरकारने कार्गो जहाजात झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय लव शर्माचे पार्थिव सोपवणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राजीव शर्मा यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याप्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाAccidentअपघात