शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नागपूर विद्यापीठात अभाविपचा गोंधळ : परिसरात तोडफोड, दोन सुरक्षारक्षक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:42 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केला. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, प्र-कुलगुरू कार्यालय प्रवेशद्वार व कुलसचिव कार्यालयात तोडफोड केली. कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.

ठळक मुद्देपूनर्मूल्यांकनाच्या मागणीसाठी केले आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ केला. सोबतच विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार, प्र-कुलगुरू कार्यालय प्रवेशद्वार व कुलसचिव कार्यालयात तोडफोड केली. कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न करणारे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे दोन सुरक्षारक्षक जखमी झाले.विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाच्या पाचव्या व तिसऱ्या सत्राचे निकाल लागलेले नाहीत. सोबतच पहिल्या सत्राचे निकाल संकेतस्थळावर दाखविण्यात येत नाहीत. सोबतच बीकॉमच्या अभ्यासक्रमात परीक्षेच्या अगोदर बदल करण्यात आले आहेत. तसेच पूनर्मूल्यांकनाच्या संदर्भात विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मन:स्ताप होत असल्याचा आरोप करत ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात दुपारच्या वेळी धडक दिली. यावेळी सुरक्षेच्या कारणावरुन विद्यार्थ्यांना थांबविण्यात आले. संतापलेल्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. काही कार्यकर्त्यांनी तोडफोड केली असल्याचा आरोप सुरक्षारक्षकांतर्फे करण्यात आला. बरेच विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी तर दीक्षांत सभागृहातच घोषणा दिल्या.‘अभाविप’चा सुरक्षारक्षकांवरच आरोपदुसरीकडे ‘अभाविप’चे महानगर मंत्री वैभव बावनकर यांनी सुरक्षारक्षकांवरच आरोप केले आहेत. शांततेने निवेदन द्यायला जात असताना सुरक्षारक्षकांनी कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर थांबविले. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत धक्काबुक्की करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान ‘अभाविप’च्या मागण्याचा सकारात्मक विचार करुन त्यांना मंजूर करण्याचे आश्वासन प्रभारी कुलसचिवांनी दिले असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. यावेळी विधीसभा सदस्य विष्णू चांगदे, वामन तुरके हेदेखील उपस्थित होते.पोलिसांनी घेतली बघ्याची भूमिकादरम्यान हा गोंधळ होत असताना विद्यापीठात पोलीस कर्मचारीदेखील उपस्थित होते. मात्र त्यांनी कुठलीही मध्यस्थी केली नाही. गोंधळ घालणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी कुलसचिव डॉ.निरज खटी यांनी सांगितले. मात्र पोलीस तक्रार करण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन