शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

Corona Virus; म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे ७० टक्के रुग्ण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 10:41 AM

Nagpur News राज्यात सर्वच ठिकाणी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. पहिल्या लाटेत हजार ते दोन हजार दरम्यान दिसून येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत चार ते आठ हजार दरम्यान गेली.

ठळक मुद्देमेडिकलने दिली कोरोनाच्या मृत्यूची कारणे ५३.७ टक्के रुग्णांचे शरीरातील ऑक्सिजन प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी होते

सुमेध वाघमारे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनुकीय बदल (म्युटेशन) झालेल्या ‘बी.१.६.१७’ या कोरोना विषाणूचा जवळपास ७० टक्के रुग्णांना गंभीर संसर्ग झाल्याने मृत्यूची संख्या वाढल्याचे कारण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेडिकल) पुढे केले आहे. या शिवाय, कोरोना रुग्णांना अत्यावश्यक सोयी देण्यास कमी पडलेली महानगरपालिका व आरोग्य विभाग, ग्रामीण व इतर भागातून उपचारासाठी उशिरा आलेले रुग्ण, यात ५३.७ टक्के रुग्णांच्या शरीरातील ९० टक्क्यांपेक्षा कमी असलेली ऑक्सिजनची पातळी, औषधांचा तुटवडा आदी कारणेही दिली आहेत.

राज्यात सर्वच ठिकाणी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. पहिल्या लाटेत हजार ते दोन हजार दरम्यान दिसून येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत चार ते आठ हजार दरम्यान गेली. दैनंदिन मृत्यूचे प्रमाणही ५० ते १००च्या दरम्यान होते. विशेष म्हणजे, जुलै ते सप्टेंबर २०२० या कोरोनाचा पहिल्या लाटेत शासकीयसह खासगी रुग्णालयात २३४५८ रुग्णांपैकी २६४१ (११.२६टक्के) तर, एप्रिल ते मे २०२१ या दुसऱ्या लाटेत ३७२३४ रुग्णांपैकी ७३११ (१९.६४ टक्के ) रुग्णांचे जीव गेले. या मागे ‘म्युटेशन’ झालेला घातक विषाणू व इतरही कारणे असल्याचे मेडिकलने स्पष्ट केले आहे.

-मेडिकलमध्ये दुसऱ्या लाटेत २४७२ रुग्णांचा मृत्यू

मेडिकलमध्ये जानेवारी ते ३१ मे २०२१ या दरम्यान ६३४७ कोरोनाचे गंभीर रुग्ण भरती झाले. यातील २४७२ रुग्णांचा मृत्यू झाला. यातील केवळ ११ टक्के रुग्णांचा शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. उर्वरीत रुग्णांची पातळी धोकादायक स्थितीत होती. शिवाय, ३६८ (१५ टक्के) रुग्ण म्हणजे मृतावस्थेत दाखल झाले. ४६९ रुग्ण (१९ टक्के ) गंभीर होऊन आल्याने त्यांचा २४ तासाच्या आतच मृत्यू झाला.

-रुग्ण गंभीर होऊन येणाऱ्यांची संख्या मोठी

मेडिकल हे ‘टर्शरी केअर सेंटर’ आहे. यामुळे शहरातील खासगीसह ग्रामीण भागातील रुग्णालयात कोरोनाचा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला मेडिकलमध्ये पाठविण्याचे प्रमाण मोठे आहे. यामुळेही मृत्यूची संख्या वाढल्याचे मेडिकलचे म्हणणे आहे. दुसऱ्या लाटेत बाहेरगावावरून आलेल्या १३.८ टक्के म्हणजे, ३३९ रुग्णांचा मृत्यू झाला. इतर शासकीय व खासगी रुग्णालयातून आलेल्या ५.० टक्के म्हणजे, १२४ रुग्णांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात गंभीर रुग्णांना भरती करून घेतले जात नसल्याचेही एक कारण आहे.

-ग्रामीण भागात व्हेंटिलेटरचा एकही बेड नाही

पहिल्या लाटेत सुरुवातीला कोविड केअर सेंटर नसल्याने लक्षणे नसलेल्या रुग्णांनाही मेडिकलमध्ये भरती केले जात होते. यामुळे मेडिकलमध्ये मृत्यूचा दर ११.२६ टक्के होता. परंतु दुसऱ्या लाटेत विशेषत: ग्रामीण भागात ‘व्हेंटिलेटर’बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली नाही. यामुळे मृत्यूचा दर वाढून १९.६४ टक्क्यांवर गेल्याचे कारण मेडिकलने दिले आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस