शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 11:24 IST

जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ असल्याने व्याघ्रसंवर्धनात भारताची मान उंच आहे.

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक असलेल्या वाघांच्या अस्तित्वापुढे शिकारीचे संकट घोंगावत आहे. सन १९०० मध्ये जगात असलेले एक लाख वाघ आता फक्त ४,४०० शिल्ल्क राहिले आहेत. देशात २,९६७ तर महाराष्ट्रात ३१२ वाघ उरले आहेत. जगाच्या तुलनेत भारतामध्ये ६० टक्के वाघ असल्याने व्याघ्रसंवर्धनात भारताची मान उंच आहे.जगात वाघाच्या नऊ प्रजाती होत्या. त्यातील कॅस्पियन, जावनिय आणि बॅलिनिज या तीन प्रजाती नामशेष झाल्या आहेत. महाराष्ट्रात पश्चिमेकडील जंगलात वाघाचे प्रमाण बरेच घटले आहे. विदर्भात अधिक वाघ असून पेंच, ताडोबा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात ही संख्या अधिक आहे.वाघांच्या शिकारी, तुटत चाललेली अन्नसाखळी हे संख्या घटण्यामागील कारण सांगितले जाते. यासोबतच रस्ता अपघात, करंट लागल्याने होणारे मृत्यू, संघटित शिकारी टोळ्या, तस्करांकडून असणारे धोके ही सुद्धा कारणे सांगितली जातात.भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने देशात दर चार वर्षांनी व्याघ्र गणना होते. त्यानुसार देशात पहिली व्याघ्र गणना २००६ साली झाली. तेव्हा देशात १,४११ वाघ होते, सन २०१० साली दुसरी गणना झाली तेव्हा १,७०६, सन २०१४ साली तिसरी गणना झाली तेव्हा देशात २,२२६ वाघ होते. वाघांच्या या संख्येत वाढ होऊन २०१८ मधील चौथ्या गणनेत देशात २,९६७ वाघ झाले आहेत.महाराष्ट्रही आघाडीवरराष्ट्रीय व्याघ्र गणनेच्या अंदाजपत्रानुसार देशात २,९६९ वाघांचा अधिवास आहे. या अहवालानुसार व्याघ्रसंवर्धनात महाराष्ट्राने आघाडी घेतली असून, राज्यात ३१२ वाघ असल्याचे समोर आले. २०१४ साली राज्यात वाघांची संख्या १९० होती. ती आता ६४ टक्क्यांनी वाढली आहे.व्याघ्रसंवर्धनात पहिली पाच राज्येराज्य                     सन-२०१४                        सन-२०१८                    स्थानमध्य प्रदेश                ३०८                                 ५२६                        प्रथमकर्नाटक                  ४०६                                ५२४                        द्वितीयउत्तराखंड                ३४०                                ४४२                        तृतीयमहाराष्ट्र                  १९०                                 ३१२                         चतुर्थतामिळनाडू            २२९                                 २६४                        पाचवेराज्यातील उत्तम चित्र हे संरक्षणात्मक आणि संघटनात्मक कामाचे फलित आहे. नागरिकांकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे. राज्य वन विभागाच्या वतीने व्याघ्र संवर्धनासाठी निरनिराळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे.- नितीन काकोडकरप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)

 

टॅग्स :Tigerवाघ