शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

७ कोटींची वसुली अन् उद्धव ठाकरे कनेक्शन; आ. राणांचे अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2022 16:48 IST

आरती सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.

नागपूर : हनुमान चालीसा, महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण ते आता कथित लव्ह जिहाद प्रकरणातून सातत्याने राणा दाम्पत्य सातत्याने चर्चेत आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. आमदार रवी राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप करत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. 

आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरती सिंग यांनी अडीच वर्षात महिन्याला ७ कोटी रुपये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पोहचवले, असा गंभीर आरोप रवी राणांनी केला. ते नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना एकसूत्री कार्यक्रम दिला होता. खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांच्यावर जितके गुन्हे दाखल करता येईल, तेवढे खोटे गुन्हे दाखल करा असे निर्देश दिले होते, असे रवी राणा म्हणाले.

महापालिका आयुक्तांवरील शाईफेक प्रकरण; आमदार रवी राणांविरोधातील गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग

आरती सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मनपा आयुक्तांवर शाईफेक झाली त्यावेळी मी अमरवातीत नसतानाही माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढला तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलीस पाठवून आम्हाला दोन दिवस नजरकैद केलं होतं. शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तेव्हा माझ्या सोबत अनेक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकलं, नवनीत राणांना नजरकैदेत ठेवलं. तसेच, अनेक कार्यकर्त्यांवर तडीपारी लावली. कोल्हे हत्या प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केल्याचा आरोपही राणा यांनी केला.

आरती सिंग यांनी अमरावतीमध्ये एकसुत्री वसुली पथक नेमलं होतं. वसुली पथकाच्या माध्यमातून अमरावतीत मोठ्या प्रमाणात गुन्हे घडले, दंगे झाले. कोल्हे यांची हत्या झाली. आज अमरावतीत रोज गुन्हे होतात, अवैधंदे चालतात, हत्या होत आहेत. आरती सिंग यांनी दर महिन्याला अमरावतीमधून सात कोटी रुपयांची वसुली केली असून त्याच्यातून उद्धव ठाकरे यांना पैसा पोहोचवल्याचा दावा राणा यांनी केला आहे. याप्रकरणातील तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे. आमच्याकडे त्या संदर्भात पुरावे आहेत ते आम्ही योग्यवेळी सीआयडीकडे देऊ असंही रवी राणा यांनी सांगितलं.

टॅग्स :PoliticsराजकारणRavi Ranaरवी राणाnavneet kaur ranaनवनीत कौर राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेArti Singhआरती सिंगAmravatiअमरावती