शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

‘आप’ राज्यातील सर्व जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2018 1:00 AM

गेल्या काही काळापासून संघटन मजबुतीसाठी धडपडणाऱ्या आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नागपुरात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली व राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. सातत्याने प्रयत्न करूनदेखील ‘आप’ला राज्यात आपले हवे तसे अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. अशा स्थितीत ग्रामीण पातळीवर संघटन मजबुतीवर ‘आप’तर्फे भर देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकांच्या नियोजनाबाबत मंथन : शेतकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून संघटन मजबुतीसाठी धडपडणाऱ्या आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी तयारी करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात नागपुरात महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली व राज्यातील सर्व लोकसभा जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. सातत्याने प्रयत्न करूनदेखील ‘आप’ला राज्यात आपले हवे तसे अस्तित्व निर्माण करता आलेले नाही. अशा स्थितीत ग्रामीण पातळीवर संघटन मजबुतीवर ‘आप’तर्फे भर देण्यात येणार आहे.२ व ३ नोव्हेंबर ला ‘आप’चे महाराष्ट्र राज्य प्रभारी दुर्गेश पाठक यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकांच्या नियोजनावर सखोल मंथन करण्यात आले. नेमक्या कुठल्या मतदारसंघात ‘आप’चे प्राबल्य आहे, तसेच मतांच्या गणितात ‘आप’ कसा बदल घडवून आणू शकेल यावर चर्चा झाली. राज्यातील सर्व लोकसभा क्षेत्रांसाठी संघटन प्रमुख नियुक्त करण्यात आले. तसेच पुढील दोन महिन्यात गाव व वॉर्ड स्तराची जबाबदारी निश्चित करण्याचादेखील निर्णय यावेळी झाला.बैठकीला ‘आप’चे राज्य संयोजक सुधीर सावंत, सहसंयोजक रंगा राचुरे, सचिव सुभाष तंवर, कोषाध्यक्ष जगजितसिंग, अजिंक्य शिंदे, उन्मेष बागवे, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ.गावित, अलीम पटेल, धनंजय शिंदे, किशोर मानध्यान, डॉ.देवेंद्र वानखडे, कविता सिंघल प्रामुख्याने उपस्थित होते.संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करावाया बैठकीत शेतकरी समस्या व दुष्काळग्रस्त परिस्थितीवरदेखील चर्चा झाली. राज्य शासनाने सर्व राज्यात दुष्काळ जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी. ग्रामीण भागात रोजगार हमीची कामे सुरू करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन पक्षातर्फे व्यापक आंदोलन उभारण्यात येईल, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली.

टॅग्स :AAPआपElectionनिवडणूक