शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

आधार अपडेट दोन महिन्यापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 9:17 AM

कोरोना संक्रमणामुळे आधार अपडेट गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.

ठळक मुद्देईपीएफओ सदस्यांना येताहेत अडचणी नागरिकांना होतोय त्रास

सैयद मोबीनलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमणामुळे आधार अपडेट गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे रखडली आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. कोणत्याही सरकारी योजनेकरिता आधार कार्ड आवश्यक आहे. परंतु, त्यात मोबाईल क्रमांकाची नोंद नसल्यामुळे ऑनलाईन दुरुस्ती करणे अशक्य होत आहे.कोरोना संक्रमण लक्षात घेता भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) सदस्यांना त्यांच्या खात्यातील ७५ टक्के किंवा तीन महिन्याच्या मूळ वेतनाएवढी रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. परंतु, अनेक सदस्यांना केवायसी अपडेट नसल्याने किंवा आधार व ईपीएफओमधील नाव जुळत नसल्याने या सुविधेचा लाभ घेणे अशक्य होत आहे. तसेच, सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याशिवाय ईपीएफओने ई-नॉमिनेशन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यातही विविध समस्या येत आहेत. सर्व कागदपत्रांमध्ये नाव व जन्मतारीख समान असलेल्या सदस्यांचे काम सुरळीत होत आहे. इतरांना मात्र बराच त्रास सहन करावा लागत आहे.रेशन दुकानांप्रमाणे सुविधा का नाही?कोरोना संक्रमणामुळे रेशन दुकानांमध्ये ग्राहकांचे बायोमेट्रिक मशीनवर पंचिंग करणे बंद करण्यात आले आहे. सध्या केवळ रेशन दुकानदाराला पंचिंग करावे लागते. अशीच व्यवस्था आधार केंद्रांवर का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आधार केंद्रे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यासंदर्भात स्थानिकस्तरावर जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घ्यायचा आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी यावर विचार करण्यात येईल असे सांगितले.

 

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड