शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
6
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
7
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
8
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
9
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
10
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
11
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
12
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
13
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
14
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
15
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
16
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
17
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
18
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
19
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
20
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांकडून रेल्वेत शिस्तीचे अनोखे प्रदर्शन, कसलाही वाद नाही, कुठेही राडा नाही

By नरेश डोंगरे | Updated: October 26, 2023 22:28 IST

Nagpur: निळी टोपी, उपरणे अन् पंचशील ध्वज घेऊन तीन दिवसांत नागपुरात सुमारे पावणेदोन लाख भीमसैनिक आले. दीक्षाभूमीवर त्यांनी माथा टेकवला अन् वैचारिक सोने लुटले. पवित्र दीक्षाभूमीवरून समतेचा संदेश घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ते आले तसे निघूनही गेले.

- नरेश डोंगरे नागपूर - निळी टोपी, उपरणे अन् पंचशील ध्वज घेऊन तीन दिवसांत नागपुरात सुमारे पावणेदोन लाख भीमसैनिक आले. दीक्षाभूमीवर त्यांनी माथा टेकवला अन् वैचारिक सोने लुटले. पवित्र दीक्षाभूमीवरून समतेचा संदेश घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ते आले तसे निघूनही गेले. एवढ्या मोठ्या संख्येत विविध मार्गाने येऊन कोणत्याच रेल्वेगाडीत अथवा रेल्वे स्थानकावर कसला राडा झाला नाही की कुणाचे काही चोरीला गेले नाही. विशेष म्हणजे, सलग ५०-५५ तासांचा या पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांचा बंदोबस्त रेल्वेच्या अवघ्या दीडशे पोलिस, जवानांनी सांभाळला.

रक्ताचा एकही थेंब न सांडवता अभूतपूर्व सामाजिक- वैचारिक क्रांती घडविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावण स्मृतींना नमन करण्यासाठी तसेच वैचारिक सोने लुटण्यासाठी दसऱ्याला दरवर्षी दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखो भीमसैनिक येतात. कुणी विमानाने, कुणी खासगी वाहनाने तर कुणी चक्क दुचाकींनी येथे येतात. प्रवासासाठी बाबांची सर्वाधिक लेकरं रेल्वे गाड्यांचा वापर करतात. दसऱ्याच्या एक दिवसांपूर्वीपासून ते दीक्षाभूमीवर दाखल होतात अन् दसऱ्याच्या दिवशी मुख्य कार्यक्रम संपला की, परतीची वाट धरतात. याही वर्षी सोमवारी २३ ऑक्टोबरपासून विविध रेल्वेगाड्यांनी त्यांचे नागपुरात आगमन सुरू झाले.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अहमदाबाद, पुरी, हावडा, गीतांजली, ज्ञानेश्वरी, महाराष्ट्र, विदर्भ, सेवाग्राम, दुरांतो, गरीब रथ या रेल्वेगाड्यांनी सर्वाधिक भीमसैनिक नागपुरात आले. विशेष म्हणजे, मुंबई ते नागपूर दोन आणि पुणे ते नागपूर एक अशा तीन स्पेशल ट्रेन भीमसैनिकांनी भरून नागपुरात आल्या. अर्थात २३ आणि २४ ऑक्टोबर या दोन दिवसांत सुमारे ८० ते ९० हजार प्रवासी नागपूरच्या मुख्य आणि अजनी रेल्वे स्थानकांवर उतरले. तेवढ्याच संख्येत २५ ऑक्टोबरच्या पहाटेपासून त्यांनी आपापल्या गावांचा मार्ग धरला. मात्र, एवढ्या प्रचंड संख्येत येणे-जाणे करणाऱ्या बाबांच्या या अनुयायांनी प्रवासादरम्यान कुठेही कसलीही अनुचित घटना घडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.

उल्लेखनीय असे की, गर्दी कशाचीही असो, बंदोबस्तासाठी पोलिसांचे प्रचंड मनुष्यबळ तैनात करावे लागते. २३, २४ आणि २५ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस प्रचंड गर्दी अनुभवणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर जीआरपी (लोहमार्ग)चे ४ अधिकाऱ्यांसह केवळ ८० पोलिस तर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) केवळ ६५ जवान बंदोबस्तासाठी तैनात होते.

एक सिंगल तक्रारही नाही!या तीन दिवसांत एवढ्या प्रचंड प्रमाणात नागपूर स्थानकावर गर्दी होती. मात्र, कुठेच काही गडबड, गोंधळ झाला नाही. कुणाचे काही चोरीला गेले नाही किंवा काही हरवलेही नाही. आमच्याकडे एक सिंगलही तक्रार आली नाही, असे रेल्वेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा काशिद सांगतात. 

टॅग्स :nagpurनागपूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी