शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अपघातामुळे कोमात गेलेल्या गरोदर महिलेची केली आधी प्रसूती, नंतर मेंदूवर शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 18:04 IST

Nagpur News अपघाताने कोमात गेलेल्या महिलेचे प्राण आधी वाचवावेत की तिच्या बाळाचे असा यक्ष प्रश्न पडलेल्या डॉक्टरांनी बाळ व बाळंतिणीचे रक्षण करून नवे जीवदान दिले.

ठळक मुद्देडॉक्टरांच्या पुढाकाराने मातृत्वाचे रक्षणबाळ व आईला मिळाले जीवदान

नागपूर : नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा अपघात झाल्याने ती कोमामध्ये गेली. मेंदूमध्ये रक्ताची मोठी गाठ तयार झाली. ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत होते. ‘पॉलीट्रॉमा’ची परिस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी वेळीच निर्णय घेतला. प्रथम कोमात असताना महिलेची प्रसूती केली, नंतर मेंदूवर शस्त्रक्रियाही केली. डॉक्टरांच्या या पुढाकारामुळे मातृत्वाचे रक्षण झाले, आईला व नवजात बाळाला जीवदान मिळाले.

भंडारा येथील २२ वर्षीय गर्भवती महिला पतीसोबत डॉक्टरांकडे जात असताना दुर्दैवी अपघात झाला. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली. भंडारा येथे प्राथमिक उपचारानंतर नागपुरात डॉ. निर्मल जयस्वाल यांच्याकडे पाठविण्यात आले. रुग्ण नागपुरात आला तेव्हा फार गंभीर अवस्थेत होता. श्वास घेण्यास त्रास होता व ऑक्सिजनचे प्रमाणदेखील कमी होत होते. रुग्ण डीप कोमाच्या अवस्थेत जात होता. शिवाय अन्य अवयव निकामी होण्याच्या धोकाही निर्माण झाला होता. गर्भारपणामध्ये झालेला अपघात, मेंदूला झालेली इजा, श्वास घेताना होणारा त्रास व पर्यायाने कमी होणारा ऑक्सिजन अशा प्रकारची तीव्र जोखीम असताना डॉ. जयस्वाल यांनी प्रसूती करून मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. नातेवाइकांकडून प्रतिसाद मिळताच रुग्णाला व्हेंटिलेटरवर घेत जोखिमीच्या परिस्थितीमध्ये महिलेची प्रसूती करण्यात आली. प्रसूतीपश्चात तिच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करून गाठ काढण्यात आली.

प्रसूती पश्चात बाळ रडलेच नाही

प्रसूती पश्चात तीन ते पाच मिनिटांहून अधिक काळ झाले तरी बाळ रडले नाही. यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. बालरोगतज्ज्ञांनी तातडीने बाळाला वाचविण्यासाठी आवश्यक उपचाराला सुरुवात केली. दुसरीकडे महिलेच्या मेंदूवर गुंतागुंतीची शस्त्रक्रियेला सुरुवात झाली. डॉक्टरांचे अथक परिश्रम, अनुभव व कौशल्याच्या बळावर आई व बाळाला जीवदान मिळाले. ही शस्त्रक्रिया डॉ. जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात न्युरोसर्जन डॉ. आलोक उमरेडकर, स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. श्वेताली देशमुख, बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना जयस्वाल, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. भावेश बरडे व बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. रवी मुंदडा यांनी केली.

 अशा रुग्णांमध्ये वेळ महत्त्वाचा

महिला रुग्णालयात आली तेव्हा तिची परिस्थिती फार गंभीर होती. यामुळे वेळेत निर्णय घेऊन उपचार करणे गरजेचे होते. तिच्या कुटुंबातील लोकांनी डॉक्टरांवर विश्वास दाखविल्यामुळेच व डॉक्टरांनी सामूहिक प्रयत्न केल्याने दोन जीव वाचविता आले.

-डॉ. निर्मल जयस्वाल, आयसीयू डायरेक्टर

टॅग्स :Healthआरोग्य