शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मल्लिकार्जुन रेड्डींकडून बंडाचा झेंडा ? जयस्वालांवर उघड टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 11:11 IST

प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी : भाजपमध्ये खळबळ, विविध चर्चांना उधाण

नागपूर : भाजप-शिवसेनेच्या (बाळासाहेब ठाकरे गट) लोकप्रतिनिधींमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याची चर्चा जोरात असताना भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन यांनी सार्वजनिक मंचावरून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांविरोधात त्यांनी उघडपणे बंडाचा झेंडाच उभारल्याची चर्चा आहे. कुठल्याही स्थितीत रामटकेचे आमदार आशीष जयस्वाल यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असे म्हणत त्यांनी वेळ आली तर पक्षातून काढले तरी चालेल अशी भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.

रविवारी जिल्हा भाजपतर्फे पारशिवनी येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत शिंदे सेनेचे खा. कृपाल तुमाने व आ. आशीष जयस्वाल हेदेखील यात उपस्थित होते. हे नेते येण्याअगोदर रेड्डी यांचे भाषण झाले. यात त्यांनी त्यांच्या मनातील राग व्यक्त केला. तुमाने आणि जयस्वाल यांना भाजपचे नेते घेऊन चालणार असतील तर त्याला माझा विरोध आहे. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही. भाजपच्या उमेदवाराला पाडून आशीष जयस्वाल आमदार झाले. त्यांना महामंडळ देण्यात आले, मात्र माजी आमदार म्हणून मला काहीच दिले नाही. ज्या व्यक्तीने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला त्याच्या मांडीला मांडी लावून नेते बसत असतील तर ते मला मान्य नाही, असे रेड्डी म्हणाले.

जयस्वाल सरकारमध्ये आहेत त्याला माझा विरोध नाही. त्यांना मंत्रिपद पाहिजे म्हणून ते आपल्यासोबत आले. मात्र मला त्यांच्यासोबत बसणे मान्य नाही. तुमाने यांनी कधीही भाजपबहुल भागाला खासदार निधी दिला नाही. त्यांना केवळ आपल्याकडून मते पाहिजे असतात, असा आरोपदेखील रेड्डी यांनी लावला. मला पक्षातून काढून टाकले तरी चालेल, असेदेखील रेड्डी म्हणाले.

रेड्डींची वर्तणूक चुकीची : बावनकुळे

दरम्यान, मल्लिकार्जुन रेड्डी यांची वर्तणूक चुकीची होती, या शब्दांत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक संपल्यानंतर त्यातील राजकारण विसरून विकासाचे राजकारण करायला हवे. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून जे काही झाले ते चुकीचेच होते. आशीष जयस्वाल व तुमाने आमच्याच विनंतीवरून मंचावर आले होते. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या मंचावर जात असतात. अशा वेळी असे बोलणे अयोग्य होते, असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAshish Jaiswalआशीष जैस्वालMallikarjun Reddyमल्लिकार्जुन रेड्डीnagpurनागपूर