शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

मल्लिकार्जुन रेड्डींकडून बंडाचा झेंडा ? जयस्वालांवर उघड टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 11:11 IST

प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी : भाजपमध्ये खळबळ, विविध चर्चांना उधाण

नागपूर : भाजप-शिवसेनेच्या (बाळासाहेब ठाकरे गट) लोकप्रतिनिधींमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याची चर्चा जोरात असताना भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन यांनी सार्वजनिक मंचावरून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांविरोधात त्यांनी उघडपणे बंडाचा झेंडाच उभारल्याची चर्चा आहे. कुठल्याही स्थितीत रामटकेचे आमदार आशीष जयस्वाल यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असे म्हणत त्यांनी वेळ आली तर पक्षातून काढले तरी चालेल अशी भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.

रविवारी जिल्हा भाजपतर्फे पारशिवनी येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत शिंदे सेनेचे खा. कृपाल तुमाने व आ. आशीष जयस्वाल हेदेखील यात उपस्थित होते. हे नेते येण्याअगोदर रेड्डी यांचे भाषण झाले. यात त्यांनी त्यांच्या मनातील राग व्यक्त केला. तुमाने आणि जयस्वाल यांना भाजपचे नेते घेऊन चालणार असतील तर त्याला माझा विरोध आहे. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही. भाजपच्या उमेदवाराला पाडून आशीष जयस्वाल आमदार झाले. त्यांना महामंडळ देण्यात आले, मात्र माजी आमदार म्हणून मला काहीच दिले नाही. ज्या व्यक्तीने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला त्याच्या मांडीला मांडी लावून नेते बसत असतील तर ते मला मान्य नाही, असे रेड्डी म्हणाले.

जयस्वाल सरकारमध्ये आहेत त्याला माझा विरोध नाही. त्यांना मंत्रिपद पाहिजे म्हणून ते आपल्यासोबत आले. मात्र मला त्यांच्यासोबत बसणे मान्य नाही. तुमाने यांनी कधीही भाजपबहुल भागाला खासदार निधी दिला नाही. त्यांना केवळ आपल्याकडून मते पाहिजे असतात, असा आरोपदेखील रेड्डी यांनी लावला. मला पक्षातून काढून टाकले तरी चालेल, असेदेखील रेड्डी म्हणाले.

रेड्डींची वर्तणूक चुकीची : बावनकुळे

दरम्यान, मल्लिकार्जुन रेड्डी यांची वर्तणूक चुकीची होती, या शब्दांत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक संपल्यानंतर त्यातील राजकारण विसरून विकासाचे राजकारण करायला हवे. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून जे काही झाले ते चुकीचेच होते. आशीष जयस्वाल व तुमाने आमच्याच विनंतीवरून मंचावर आले होते. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या मंचावर जात असतात. अशा वेळी असे बोलणे अयोग्य होते, असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAshish Jaiswalआशीष जैस्वालMallikarjun Reddyमल्लिकार्जुन रेड्डीnagpurनागपूर