शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
3
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
4
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
5
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
6
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
7
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
8
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!
9
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
10
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
11
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
12
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
13
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
14
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
15
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
16
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
17
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
18
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
19
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले

मल्लिकार्जुन रेड्डींकडून बंडाचा झेंडा ? जयस्वालांवर उघड टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 11:11 IST

प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी : भाजपमध्ये खळबळ, विविध चर्चांना उधाण

नागपूर : भाजप-शिवसेनेच्या (बाळासाहेब ठाकरे गट) लोकप्रतिनिधींमध्ये ‘ऑल इज वेल’ नसल्याची चर्चा जोरात असताना भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन यांनी सार्वजनिक मंचावरून त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांविरोधात त्यांनी उघडपणे बंडाचा झेंडाच उभारल्याची चर्चा आहे. कुठल्याही स्थितीत रामटकेचे आमदार आशीष जयस्वाल यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही असे म्हणत त्यांनी वेळ आली तर पक्षातून काढले तरी चालेल अशी भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असून प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली आहे.

रविवारी जिल्हा भाजपतर्फे पारशिवनी येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यासोबत शिंदे सेनेचे खा. कृपाल तुमाने व आ. आशीष जयस्वाल हेदेखील यात उपस्थित होते. हे नेते येण्याअगोदर रेड्डी यांचे भाषण झाले. यात त्यांनी त्यांच्या मनातील राग व्यक्त केला. तुमाने आणि जयस्वाल यांना भाजपचे नेते घेऊन चालणार असतील तर त्याला माझा विरोध आहे. एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही. भाजपच्या उमेदवाराला पाडून आशीष जयस्वाल आमदार झाले. त्यांना महामंडळ देण्यात आले, मात्र माजी आमदार म्हणून मला काहीच दिले नाही. ज्या व्यक्तीने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला त्याच्या मांडीला मांडी लावून नेते बसत असतील तर ते मला मान्य नाही, असे रेड्डी म्हणाले.

जयस्वाल सरकारमध्ये आहेत त्याला माझा विरोध नाही. त्यांना मंत्रिपद पाहिजे म्हणून ते आपल्यासोबत आले. मात्र मला त्यांच्यासोबत बसणे मान्य नाही. तुमाने यांनी कधीही भाजपबहुल भागाला खासदार निधी दिला नाही. त्यांना केवळ आपल्याकडून मते पाहिजे असतात, असा आरोपदेखील रेड्डी यांनी लावला. मला पक्षातून काढून टाकले तरी चालेल, असेदेखील रेड्डी म्हणाले.

रेड्डींची वर्तणूक चुकीची : बावनकुळे

दरम्यान, मल्लिकार्जुन रेड्डी यांची वर्तणूक चुकीची होती, या शब्दांत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. निवडणूक संपल्यानंतर त्यातील राजकारण विसरून विकासाचे राजकारण करायला हवे. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून जे काही झाले ते चुकीचेच होते. आशीष जयस्वाल व तुमाने आमच्याच विनंतीवरून मंचावर आले होते. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या मंचावर जात असतात. अशा वेळी असे बोलणे अयोग्य होते, असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAshish Jaiswalआशीष जैस्वालMallikarjun Reddyमल्लिकार्जुन रेड्डीnagpurनागपूर