शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

वामन मेश्राम व त्यांच्या साधीदारांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2022 22:28 IST

Nagpur News वामन मेश्राम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, मनाई आदेशांचे उल्लंघन करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

ठळक मुद्देपाच हजारांहून अधिक पोलीस तैनात५५ जणांना नोटिशी बजावल्या

नागपूर : न्यायालयाचे निर्देश व परवानगी नसतानाही पोलिसांनी शहराच्या विविध भागातून भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्यासह सुमारे अडीच हजार जणांना ताब्यात घेतले होते. मेश्राम यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केल्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आले. दरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी एसआरपीसह पाच हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. लोकांना संयमाने नियंत्रित करण्याच्या सूचना दिल्या. क्यूआरटीच्या ८ तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या.

वामन मेश्राम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात बेकायदेशीरपणे जमाव जमवणे, मनाई आदेशांचे उल्लंघन करणे आदी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. आयोजकांनी सुरुवातीला बेझनबाग ते बडकस चौकापर्यंत मोर्चा काढण्याचे सांगितले होते, तर सोशल मीडिया आणि पोस्टर्समध्ये संघ मुख्यालयाचा घेराव करण्याचे लिहिले होते. नागपुरातील विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ६ ऑक्टोबरऐवजी इतर दिवशी मोर्चा काढण्याची विनंती केली होती. पोलिसांना आंदोलकांशी चर्चेची भूमिका घेतली होती. उच्च न्यायालयात याचिका रद्द झाल्यानंतरही सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी जरीपटका, पाचपावली, कोतवाली व तहसील पोलीस ठाण्याच्या परिसरात कलम १४४ अन्वये जमावबंदीचे आदेश देऊन ५५ जणांना नोटिसा बजावल्या. लाऊडस्पीकरवर चारपेक्षा जास्त लोक एकत्र न करण्याचे जाहीर केले, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

पोलिसांचा आंदोलकांवर ‘वॉच’

आयोजक अद्याप सर्वोच्च न्यायालयात गेलेले नाहीत. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. संघ मुख्यालयावर हल्ला बोल करण्याचे आयोजक सुरुवातीपासूनच म्हणत होते. कलम १९ चा वापर खासगी संस्था-संस्थेवर मोर्चा काढण्यासाठी केला जाऊ शकत नाही. आयोजकांच्या भूमिकेवर पोलिस लक्ष ठेवून आहेत, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसारच पोलीस कारवाई : उपमुख्यमंत्री

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पवित्र दिवशी लाखो लोक नागपुरात येतात. परंतु कधीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत नाही. यंदा काही जणांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी याचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. हे योग्य नाही. न्यायालयानेही याचाच विचार करून कदाचित आदेश दिले असावे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस कारवाई करीत आहे, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीagitationआंदोलन