शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नागपूरमधील १२ बेकायदेशीर शाळांपैकी ५ बोगस शाळांविरोधात गुन्हा दाखल

By गणेश हुड | Updated: October 27, 2023 14:56 IST

नागपूर जिल्ह्यात १२ शाळा अनधिकृत असून त्यांना शिक्षण विभागाने बंद करण्यासाठी नोटीस दिली होती

नागपूर :  जिल्हा परिषद सदस्यांच्या रेट्यामुळे अखेर जिल्ह्यात चालणाऱ्या १२ पैकी ५ बोगस ( बेकायदेशीर)शाळा विरूध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे बोगस शाळा चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत  या विषयावर वादळी चर्चा झाली. सर्व बोगस शाळांवर फौजदारी कारवाईचे निर्देश शिक्षण सभापती राजकुमार कुसूंबे यांनी शिक्षण विभागाला दिले.

नागपूर जिल्ह्यात १२ शाळा अनधिकृत असून त्यांना शिक्षण विभागाने बंद करण्यासाठी नोटीस दिली होती. मात्र सदर शाळेच्या संचालकांनी याकडे दुर्लक्ष करून शाळा सुरुच ठेवल्या. बेकायदेशीर शाळा बंद होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्या शाळांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात होते. यालाही शाळा संचालक जुमानत नसल्याचे पाहून बैठकीत निर्णय घेण्यात आला. सदस्यांनी पुन्हा अनधिकृत शाळांबाबत प्रश्न उपस्थित करून शिक्षण विभागास धारेवर धरण्याचा प्रयत्न केला असता,शिक्षण विभागाने १२ पैकी ५ अनाधिकृत शाळांविरूद एफआयआर करण्यात आल्याची माहिती दिली. जिल्ह्यात सर्वाधिक अनधिकृत शाळा या हिंगणा तालुक्यातील आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १८ नुसार कुठलेही व्यवस्थापन विनापरवानगी शाळा सुरू करू शकत नाही. अशा शाळा कलम १८(५)नुसार कारवाईस पात्र आहे. अशा विनापरवानगी १२ शाळांची यादी शिक्षण विभागाने सादर केली. त्यात नागपूर (ग्रा.)मधील एका शाळेवर एफआयर तर एका शाळेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून, हिंगणा तालुक्यातील ५ पैकी ३ शाळांवर तर सावनेर तालुक्यातील एका शाळेवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पारशिवनी तालुक्यातील एका शाळेला मान्यता मिळाली असून काटोल तालुक्यातील एका शाळेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याची माहिती शिक्षण विभागाने यावेळी दिली.

शाळाबाह्य विद्यार्थी आढळल्यास मुख्याध्यापक जबाबदार

शहरासोबतच ग्रामीण भागातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू, नये यासाठी शासनाच्यावतीने दरवर्षी या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येते. त्यानंतरही अनेक शाळाबाह्य विद्यार्थी आढळून येतात. त्यामुळे शाळेच्या एक किलोमिटर परिघात शाळाबाह्य विद्यार्थी आढळल्यास मुख्याध्यापकाला जबाबदार ठरविण्याच्या निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरSchoolशाळा