शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

तर दिल्लीपेक्षाही मोठी दुर्घटना घडली असती; नागपूर रेल्वे स्थानक आग प्रकरणावर प्रवाशांचे मत

By नरेश डोंगरे | Updated: February 17, 2025 00:35 IST

जीआरपी-आरपीएफच्या जवानांनी टाळली भयंकर दुर्घटना

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांनी प्रसंगावधान दाखवून तत्काळ उपाययोजना केली नसती तर आज रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावर दिल्लीपेक्षाही भयंकर दुर्घटना घडली असती असा सूर प्रवाशांमध्ये दिसत आहे.

दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे अनेक बळी गेले. या दुर्घटनेपासून धडा घेत प्रभावी उपाययोजना करण्याचा अलर्ट सर्वच रेल्वे पोलिस आणि आरपीएफला देण्यात आला होता. त्याची तत्काळ दखल घेत नागपूर रेल्वे स्थानकावर सुरक्षेसाठी अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यामुळे वॅगनमधून आगीचा भडका उडताच आणि आगीने शेडलाही कवेत घेतल्याचे लक्षात येताच रेल्वेस्थानकावर बंदोबस्तावर असलेले कर्मचारी तत्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. त्यांनी एकीकडे आग विझविणे सुरू केले. दुसरीकडे प्रवाशांचीही खबरदारी घेतली.

रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल, परिचालन व्यवस्थापक कृष्णात पाटील, आरपीएफ कमांडंट मनोज कुमार आदींनी घटनास्थळ गाठले.

जीआरपीचे निरीक्षक गौरव गावंडे आणि आरपीएफचे निरीक्षक सत्येंद्र यादव यांच्या नेतृत्वात हवालदार चंद्रकांत भोयर, अमित त्रिवेदी मिश्रा, भूपेश धोंगडी, बी. आर. ठाकूर, ऋषिकांत राखुंडे, अनिल त्रिवेदी आदींनी फलाट तसेच बाजूला उभे असलेल्या तेलंगणा एक्स्प्रेसच्या कोचमधून अग्निशमन उपकरणे काढून तातडीने आग विझविणे सुरू केले. त्यामुळेच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

तर झाली असती चेंगराचेंगरी

आगीचे लोळ पाहून फलाट तसेच तेलंगणा एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी दोन्ही बाजूने उड्या घेण्याचा पवित्रा घेतला. गाडीबाहेर पडण्यासाठी सर्वच जण एकाच वेळी धावपळ करीत असल्याचे पाहून जीआरपी आणि आरपीएफ तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना तसे करण्यापासून अटकाव केला. घाबरू नका, उड्या घेऊ नका, पळू नका, आम्ही येथेच आहोत, फलाटावर सुरक्षित ठिकाणी झोपून जा, असे पीए सिस्टममधून वारंवार सांगितले गेले. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षेची खात्री पटली. परिणामी, फलाटावर संभाव्य चेंगराचेंगरीची घटना टळली.

ती महिला बचावली

शेडला लागलेल्या आगीचा लोळ खाली पडताना एका महिलेच्या पाठीला भाजले. ती दिल्लीला जात होती. जीआरपी जवानांनी लगेच प्रथमोपचार केले. जास्त दुखापत नसल्याने ती महिला बचावली अन् दिल्लीकडे रवाना झाली.

ट्रेनच्या 'चिंगारी'ने केला घात

सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून आगीचे कारण पुढे आले. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, ज्या मालगाडीच्या वॅगनला आग लागली. त्याच गाडीच्या चाकाच्या घर्षणातून चिंगारी (ठिणग्या) उडाल्याने अतिज्वलनशील पेट्रोल-डिझेलच्या वॅगनने पेट घेतला आणि भडका उडाला. सीसीटीव्हीत हे सर्व दिसत असल्याचेही संबंधित अधिकाऱ्याने 'लोकमत'ला सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरfireआग