शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरोना काळात देशातील बँकांमध्ये ९९ हजार कोटींचे घोटाळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 07:25 IST

माहिती अधिकारातून उघड : बँकांविरोधात ३ लाखांहून अधिक तक्रारी

नागपूर : देशातील विविध बँका व वित्त संस्थांमध्ये मागील आर्थिक वर्षातील पहिल्या आठच महिन्यांत थोडेथोडके नव्हे, तर ६३ हजाराहून अधिक घोटाळे झाले. घोटाळ्याची रक्कम ही ९९ हजार कोटींहून अधिक होती. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडे यासंदर्भात विचारणा केली होती. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत देशभरातील बँकांमध्ये एकूण किती घोटाळे झाले, यात किती रकमेचा समावेश होता, किती घोटाळ्यात बँक कर्मचाऱ्यांचा समावेश होता, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले  होते.

आरबीआयकडून प्राप्त अधिकृत माहितीनुसार, १ एप्रिल २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या आठ महिन्यांच्या कालावधीत विविध बँका व वित्त संस्थांमध्ये ६३ हजार ३४५ घोटाळे उघडकीस आले. यात ९९ हजार ८६३ कोटींच्या निधीचा समावेश होता. ग्राहकांकडून बँकांच्या कारभाराविरोधात तक्रार करण्याचे देखील प्रमाण वाढले आहे. वर्षभरात विविध बँकांविरोधात बँकिंग लोकपाल कार्यालयाकडे ३ लाख २० हजार ७०३ तक्रारी झाल्या, तर ग्राहक संरक्षण विभागाकडे ३७ हजार १३४ तक्रारी करण्यात आल्या. बँकांमधील गैरव्यवहारांमध्ये तेथील काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असतोच. मात्र, त्यात किती कर्मचारी सापडले याची माहिती उपलब्ध झाली नाही.

बँकांच्या २,३९९ शाखा बंद१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत देशभरातील काही बँकांचे विलिनीकरण झाले. आर्थिक वर्षात देशभरातील विविध बँकांच्या २,३९९ शाखा बंद झाल्या.

कर्मचाऱ्यांवरील कारवाईची माहितीच नाहीयाअगोदरच्या आर्थिक वर्षांत बँकांमधील गैरव्यवहारात तेथील काही कर्मचाऱ्यांचादेखील समावेश होता. परंतु एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत किती कर्मचारी सहभागी होते व त्यांच्यावर नेमकी कुठली कारवाई करण्यात आली, याची कुठलीही माहिती ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’कडे उपलब्ध नाही

टॅग्स :bankबँकCrime Newsगुन्हेगारी