शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

तोतलाडोहात ९० टक्के जलसाठा : २०१३ नंतर प्रथमच प्रकल्प भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:35 IST

मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पातून पाणी सोडल्याने तोतलाडोह प्रकल्पातील जलसाठा मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत ९० टक्के झाला आहे. जलसाठा ९५ टक्क्यावर पोहचल्यास प्रकल्पातील पाणी सोडावे लागणार आहे.

ठळक मुद्देजलसाठा पुन्हा वाढल्यास पाणी सोडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पातून पाणी सोडल्याने तोतलाडोह प्रकल्पातील जलसाठा मंगळवारी सायंकाळी ५ पर्यंत ९० टक्के झाला आहे. जलसाठा ९५ टक्क्यावर पोहचल्यास प्रकल्पातील पाणी सोडावे लागणार आहे. याचा विचार करता जिल्हा प्रशासनाने पेंच व कन्हान नदीच्या काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. २०१३ मध्ये मध्य प्रदेशात चांगला पाऊ स झाला होता. त्यावेळी तोतलाडोहातून पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर प्रथमच हा प्रकल्प पुन्हा भरला आहे.तोतलाडोह प्रकल्पात ९५ टक्के जलसाठा झाल्यास प्रकल्पातून पाणी सोडले जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. तोतलाडोह ते नवेगाव खैरी(पेंच) प्रकल्पाचे अंतर ३० किलोमीटर आहे. तोतलाडोतून सोडलेले पाणी तीन तासानंतर या प्रकल्पात पोहचेल. नवेगाव खैरी प्रकल्पात सध्या १०२.९८ दलघमी जलसाठा आहे. तो एकू ण क्षमतेच्या ४५.०६ टक्के आहे.रस्त्यांवर पाणी साचलेमंगळवारी सायंकाळी ४.४५ नंतर नागपूर शहर व परिसरात चांगला पाऊ स झाला. शहरातील रस्त्यांवर पुन्हा पाणी साचले होते. परंतु नागपूर विमानतळ परिसरात जोराचा पाऊ स न झाल्याने शहरातील पावसाची नोंद झाली नाही. हवामान विभागाने ७ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा दिला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला होता. शाळा -महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा रद्द करण्यात आला होता. मात्र या तारखेला पाऊ स आला नाही. मंगळवारी पावसाने पुन्हा जोर पकडला. पूर्व, मध्य व दक्षिण नागपुरात चांगला पाऊ स झाला. शहराच्या इतरही भागात पाऊ स पडला पण त्यात जोर नव्हता. मंगळवारी सकाळी ८.३० पर्यंत नागपूर शहरात १.६ मि.मी. पावासाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ११ व १२ तारखेला चांगला पाऊ स होण्याची शक्यता आहे.अंबाझरी, गोरेवाडा काठोकाठ भरले 

नागपूर शहरात मंगळवारपर्यंत ९८१ मि.मी. पाऊ स पडला. परंतु यंदाच्या पावसाळ्यात अंबाझरी व गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाले नाही. मात्र मंगळवारी दोन्ही तलाव काठोकाठ भरले. जोराचा पाऊ स झाल्यास गोरेवाडा व अंबाझरी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. गोरेवाड्याची पाणी पातळी ३१४.५० मीटर झाली आहे. या प्रकल्पाची सर्वाधिक पाणी पातळी ३१५.६५ मीटर आहे. तर अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंटच्या भिंतीच्या काठापर्यत पाणी आले आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी