पीक कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडून ९३३ कोटींचे नियोजन
By Admin | Updated: May 23, 2014 01:11 IST2014-05-23T01:11:00+5:302014-05-23T01:11:00+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत असल्याने या बँकेडून होणारा पीक कर्जाचा पुरवठा राष्ट्रीयकृत बँकांकडे स्थानांतरित करण्यात आला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी पीक कर्जाचे ९३३ कोटींचे

पीक कर्ज राष्ट्रीयकृत बँकेकडून ९३३ कोटींचे नियोजन
यंत्रणा तयार
नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक अडचणीत असल्याने या बँकेडून होणारा पीक कर्जाचा पुरवठा राष्ट्रीयकृत बँकांकडे स्थानांतरित करण्यात आला आहे. २०१४-१५ या वर्षासाठी पीक कर्जाचे ९३३ कोटींचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात ७४६ कोटी रुपये खरीप हंगामासाठी तर १८७ कोटी रुपये रब्बी हंगामासाठी होते. १३९ कोटी रुपये जिल्हा बँकेला कर्ज वाटप करायचे होते. पण बँक अडचणीत असल्याने हे कर्ज वाटप राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांकडे वळते करण्यात आले आहे. आतापर्यंत ५५१९ शेतकर्यांना ४७ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकेच्या जिल्ह्णात एकूण १७८ शाखा आहेत. त्यापैकी १५८ शाखांमधून पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी सहकार खात्याने ५८ संपर्क अधिकार्यांची नियुक्ती केली असून प्रत्येक संपर्क अधिकार्याकडे तीन शाखांचे काम देण्यात आले आहे. शेतकर्यांच्या कर्जाची सर्व प्रकरणे बँक आॅफ इंडियाच्या शहरातील मध्यवर्ती कार्यालयातून मंजूर केली जाणार असल्याने त्याला विलंब होणार नाही, असा सहकार खात्याचा दावा आहे. स्टेट बँक आॅफ इंडिया आणि महाराष्ट्र बँक या दोन मोठ्या बँकांसोबतही सकार खात्याची चर्चा सुरू असून या बँकेतूनही बँक आॅफ इंडियाप्रमाणे यंत्रणा राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा सहकाही बँकेतून कर्ज घेणार्या व त्याची परतफेड करणार्या २६०० शेतकर्यांना कर्ज वाटपासाठी नाहरकत प्रमाणपत्रे देण्यात आली असून यापैकी ३३ शेतकर्यांची कर्जाची प्रकरणे मंजुरीसाठी सादर करण्यात आली आहे. खरीप हंगामात एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी सहकार खात्याने यंत्रणा तयार केली आहे, असे खरीप आढावा बैठकीत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)