जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ८६ कोटींची मदत
By Admin | Updated: May 15, 2014 02:38 IST2014-05-15T02:38:56+5:302014-05-15T02:38:56+5:30
मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनातर्फे ८६ कोटींचे मदत वाटप करण्यात आल्याची ..

जिल्ह्यातील गारपीटग्रस्तांना ८६ कोटींची मदत
नागपूर : मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे जिल्ह्यातील १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासनातर्फे ८६ कोटींचे मदत वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
नुकसान भरपाईपोटी शासनाकडे १५६ कोटींची मागणी करण्यात आली होती. पैकी ६६ कोटी ७0 लाख प्राप्त झाले होते. त्याचे वाटप झाले आहे. ८८ कोटींचे अर्थसाहाय्य शासनाच्या आकस्मिकता निधीतून मंजूर करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश १३ मे २0१४ रोजी निर्गमित केले आहे. ही मदत लवकरच शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याचे देशमुख म्हणाले.
मागील मदत वाटपाच्या तुलनेत यावेळी मदतीच्या रकमेत अडीच पटीने वाढ केली आहे. गेल्या वेळी कोरडवाहू शेतकर्यांना हेक्टरी ४,५00 रुपयांची मदत दिली होती. आता ती १0,000 करण्यात आली आहे. ओलिताच्या शेतकर्यांना ९,000 ऐवजी १५,000 तर फळबागांना हेक्टरी १२,000 वरून ३0,000 करण्यात आले आहे. शेतकर्यांच्या मदत वाटपाच्या रकमेतून बँकांनी कोणत्याही स्वरूपाची कपात करू नये अशा सूचना बँकांना देण्यात आल्याचे देशमुख म्हणाले. (प्रतिनिधी)