शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

८० बालवाड्या बंदचा नागपूर मनपाचा घाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 10:36 AM

नागपूर मनपा शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी २०१५ मध्ये सभागृहात बालवाडी, केजी-१ व केजी- २ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुढील शैक्षणिक सत्रात हे वर्ग बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.

ठळक मुद्देशाळांची १,२२० ने पटसंख्या घटली विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

गणेश हुड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये, आजच्या स्पर्धेच्या युगात गरीब विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, मनपा शाळांची पटसंख्या वाढावी यासाठी २०१५ मध्ये सभागृहात बालवाडी, केजी-१ व केजी- २ वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुढील शैक्षणिक सत्रात हे वर्ग बंद करण्याचा घाट शिक्षण विभागाने घातला आहे.आमची प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी आहे. बालवाडी चालवण्याची जबाबदारी नाही. अशी भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. मनपाचा हा निर्णय तुघलकी व आत्मघातकी ठरणार आहे. बालवाडी व केजी-१ व केजी -२ चे वर्ग बंद केल्यास गरीब कुटुंबातील हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.२०१८-१९ च्या तुलनेत २०१९- २० या वर्षात मनपा शाळांची पटसंख्या १२२०ने घटली. तर बालवाडीतील पटसंख्या ५२२ ने वाढली आहे. मनपा शाळातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ९,३३६ असून ९ वी ते १२ वी या वर्गात ३ हजार विद्यार्थी आहेत.

बालवाडी, केजी-१ व केजी -२ मधून पुढे हेच विद्यार्थी मनपा शाळेत प्रवेश घेतात. यातून पटसंख्या वाढीला मदत होते. असे असतानाही हे वर्ग बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मनपाच्या अगणवाडीतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

८० शिक्षक अतिरिक्त ठरतीलमनपा शाळांतील पटसंख्या वाढावी म्हणून अगणवाडी, केजी- १ व केजी - २ वर्ग सुरू करून यासाठी शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आला होता. असे ८० वर्ग बंद केल्यास तितकेच शिक्षक अतिरिक्त असल्याने अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढेल.

अंगणवाडी बंद केल्यास शाळाही बंद होतीलमनपा शाळांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. पटसंख्या वाढीसाठी अंगणवाडी व केजी -१ व केजी- २ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण मनपा प्रशासनाने पुढील सत्रासाठी शिक्षकांची नियुक्ती केलेली नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात असे वर्ग बंद केल्यास भविष्यात मनपाच्या शाळा बंद पडतील. शिक्षक अतिरिक्त ठरतील. गरीब विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात येईल.- राजेश गवरे, अध्यक्ष, शिक्षक संघटना मनपा.

टॅग्स :Schoolशाळा