शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव
2
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
3
अमेरिका-इराणमध्ये तणाव, इराणने हवाई क्षेत्र केले बंद, एअर इंडिया आणि इंडिगोने ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी केली जारी
4
भारतीय कोस्ट गार्डची कारवाई; भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी नौकेसह 9 ताब्यात
5
Municipal Election 2026 Exit Poll Live: मुंबईत ठाकरेंना झटका बसणार, युतीला किती जागा मिळणार?
6
PMC Election Exit Poll 2026: पुण्यात भाजपाच राहणार की, राष्ट्रवादी बसणार सत्तेत, कौल कुणाला?
7
Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान
8
मोठा दणका! निवडणूक ड्युटीवर 'दांडी' मारणाऱ्या १५५ कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरात गुन्हा
9
BMC Election 2026 Exit Poll: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा एक्झिट पोल
10
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
11
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
12
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
13
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
14
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
15
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
16
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
17
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
18
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
19
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
20
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नात जेवण केले अन ८० पाहुणे आजारी पडले: कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार

By योगेश पांडे | Updated: December 13, 2023 22:06 IST

अमरावती रोडवरील चोकरधानी येथील घटना

नागपूर: लग्नसमारंभातील जेवणामुळे वरासह ८० जण आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. अमरावती रोडवरील चोकर धानी येथे घडलेल्या या घटनेबाबत कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वर्धमान नगर येथील व्यापारी कैलाश बत्रा यांच्या मुलाचे १० डिसेंबर रोजी लग्न झाले होते. बत्रा यांनी ९ डिसेंबर रोजी चोकर धानी येथे संगीत आणि १० डिसेंबर रोजी लग्न समारंभ आयोजित केला होता. बत्रा आणि त्यांचे कुटुंबीय ९ डिसेंबरपासून चोकर धानी येथेच होते. १० डिसेंबर रोजी दुपारच्या जेवणानंतर लगेच अनेकांना प्रकृतीची समस्या सुरू झाली. मात्र वातावरणामुळे झाले असे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. रात्री रिसेप्शनमध्ये जेवण करत असताना, निमंत्रितांनी जेवणाला दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली.

चोकर धानी व्यवस्थापनाने याकडे लक्ष दिले नाही. रिसेप्शनमध्ये व्यस्त असल्याने बत्रा यांनाही नेमके सत्य कळू शकले नाही. रात्री १२ वाजता निमंत्रितांना पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. ११ डिसेंबर रोजी सकाळी या घटनेची माहिती चोकर धानीचे संचालक धनराज सावलानी यांना देण्यात आली. ११ डिसेंबर रोजी दुपारी बहुतेक पाहुणे आपापल्या शहराकडे रवाना झाले. काही ट्रेनमध्ये तर काही विमानात आजारी पडले. दिल्लीला पोहोचल्यानंतर विमान प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या मुलीला विमानतळ कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय मदत दिली. बत्रा यांच्या मुलासह कुटुंबातील ७ सदस्यदेखील आजारी पडले.

दरम्यान, लग्नासाठी आलेल्या लोकांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत स्थानिक आणि विविध शहरांमधून फोन येऊ लागले. जवळपास ८० जणांनी बत्रा यांना डॉक्टरांकडून उपचार घेतल्याचे 'प्रिस्क्रिप्शन' पाठवले. चौकशी केल्यावर, निमंत्रितांनी सांगितले की रिसेप्शन दरम्यानच काही लोकांना उलट्या झाल्या. बत्रा यांनी मंगळवारी कळमेश्वर पोलीस ठाण्यात चोकर धानीचे संचालक पार्वती लक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर, जीतू मोहन सावलानी, श्याम सावलानी, मोहन सावलानी, नरेश सावलानी, सोनी सावलानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर बिघडलेले, भेसळयुक्त आणि विषारी अन्न दिल्याचा ठपका ठेवत परिसराचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जेवणातून येत होता उग्र वास10 डिसेंबर रोजी रिसेप्शन दरम्यान बत्रा यांच्या इव्हेंट मॅनेजरने चोकर धानीतील मॅनेजर पवारकडे पनीरच्या भाजीमधील दुर्गंधीबद्दल तक्रार केली होती आणि ती भाजी काढून टाकण्यास सांगितले होते. यानंतरही व्यवस्थापकाने भाजी काढली नाही. आरोपींनी अधिक लोकांना जेवण दिले जात असल्याचे सांगून जादा पैसे घेतले, असा आरोपदेखील तक्रारीत करण्यात आला आहे. कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार आल्याचे सांगत माहिती देण्याचे टाळले.

टॅग्स :nagpurनागपूर