शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

लग्नात जेवण केले अन ८० पाहुणे आजारी पडले: कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार

By योगेश पांडे | Updated: December 13, 2023 22:06 IST

अमरावती रोडवरील चोकरधानी येथील घटना

नागपूर: लग्नसमारंभातील जेवणामुळे वरासह ८० जण आजारी पडल्याची घटना समोर आली आहे. अमरावती रोडवरील चोकर धानी येथे घडलेल्या या घटनेबाबत कळमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वर्धमान नगर येथील व्यापारी कैलाश बत्रा यांच्या मुलाचे १० डिसेंबर रोजी लग्न झाले होते. बत्रा यांनी ९ डिसेंबर रोजी चोकर धानी येथे संगीत आणि १० डिसेंबर रोजी लग्न समारंभ आयोजित केला होता. बत्रा आणि त्यांचे कुटुंबीय ९ डिसेंबरपासून चोकर धानी येथेच होते. १० डिसेंबर रोजी दुपारच्या जेवणानंतर लगेच अनेकांना प्रकृतीची समस्या सुरू झाली. मात्र वातावरणामुळे झाले असे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. रात्री रिसेप्शनमध्ये जेवण करत असताना, निमंत्रितांनी जेवणाला दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली.

चोकर धानी व्यवस्थापनाने याकडे लक्ष दिले नाही. रिसेप्शनमध्ये व्यस्त असल्याने बत्रा यांनाही नेमके सत्य कळू शकले नाही. रात्री १२ वाजता निमंत्रितांना पोटदुखी, मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. ११ डिसेंबर रोजी सकाळी या घटनेची माहिती चोकर धानीचे संचालक धनराज सावलानी यांना देण्यात आली. ११ डिसेंबर रोजी दुपारी बहुतेक पाहुणे आपापल्या शहराकडे रवाना झाले. काही ट्रेनमध्ये तर काही विमानात आजारी पडले. दिल्लीला पोहोचल्यानंतर विमान प्रवासादरम्यान आजारी पडलेल्या मुलीला विमानतळ कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय मदत दिली. बत्रा यांच्या मुलासह कुटुंबातील ७ सदस्यदेखील आजारी पडले.

दरम्यान, लग्नासाठी आलेल्या लोकांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत स्थानिक आणि विविध शहरांमधून फोन येऊ लागले. जवळपास ८० जणांनी बत्रा यांना डॉक्टरांकडून उपचार घेतल्याचे 'प्रिस्क्रिप्शन' पाठवले. चौकशी केल्यावर, निमंत्रितांनी सांगितले की रिसेप्शन दरम्यानच काही लोकांना उलट्या झाल्या. बत्रा यांनी मंगळवारी कळमेश्वर पोलीस ठाण्यात चोकर धानीचे संचालक पार्वती लक्ष्मी इन्फ्रास्ट्रक्चर, जीतू मोहन सावलानी, श्याम सावलानी, मोहन सावलानी, नरेश सावलानी, सोनी सावलानी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर बिघडलेले, भेसळयुक्त आणि विषारी अन्न दिल्याचा ठपका ठेवत परिसराचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जेवणातून येत होता उग्र वास10 डिसेंबर रोजी रिसेप्शन दरम्यान बत्रा यांच्या इव्हेंट मॅनेजरने चोकर धानीतील मॅनेजर पवारकडे पनीरच्या भाजीमधील दुर्गंधीबद्दल तक्रार केली होती आणि ती भाजी काढून टाकण्यास सांगितले होते. यानंतरही व्यवस्थापकाने भाजी काढली नाही. आरोपींनी अधिक लोकांना जेवण दिले जात असल्याचे सांगून जादा पैसे घेतले, असा आरोपदेखील तक्रारीत करण्यात आला आहे. कळमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलासे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रार आल्याचे सांगत माहिती देण्याचे टाळले.

टॅग्स :nagpurनागपूर