शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात ७९ मिमी पाऊस; बावनथडीत १०, गोसेखुर्द धरणात १४ टक्के जलसाठा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:44 IST

चार दिवसांपासून पावसाचा जोर : धान उत्पादकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा !

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात १ लाख ९५ हेक्टर क्षेत्रात धान, सोयाबीन, कापूस, भाजीपाला व अन्य पिकांची लागवड होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात २९ जूनपर्यंत १८९.३ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना केवळ ७९.९ मिमी पाऊस झाला. पडलेल्या पावसाची टक्केवारी ४२.२ इतकी आहे. सध्याच्या स्थितीत बावनथडी धरणात १०.५४ टक्के तर गोसेखुर्द धरणात १४.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धान उत्पादकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

खरीप हंगामाला प्रारंभ झाल्यापासून सिंचनाचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या काळात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे; मात्र सध्याच्या स्थितीत बावनथडी धरणात १०.५४ टक्के जलसाठा असून, गोसेखुर्द धरणात १४.४४ टक्के जलसाठा कायम आहे. कारधा येथील इशारा व धोक्याची पातळी २४५ मीटर असून सध्या वैनगंगेत २४१.५२ मीटर पाणी पातळी आहे. 

गोसे धरणातून ८० क्युमेक्स पाण्याचा विसर्गआगामी काळात पडणारा पाऊस लक्षात घेता पूर नियंत्रणासाठी २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता गोसेखुर्द धरणातून ८० क्युमेक्स क्षमतेने वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले. नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने काळजी व सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला होता.

धापेवाडा धरणाचे तीन दरवाजे उघडलेतिरोडा तालुक्यातील थापेवाडा धरणातून २७ जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रारंभी २ गेट उघडण्यात आले. तर २९ जून रोजी तीन गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत धापेवाडा धरणात २२.६९ टक्के जलसाठा असून २८९.७७ क्सुमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

१५४ गावांसाठी पावसाळा ठरतोय संकटकाळजिल्ह्यात वैनगंगा नदीकाठावर २९ गावे असून, चुलबंद ३१, बावनथडी ९, कान्हान ४, अशी १५४ गावे नदीकाठावर आहेत. तर धरण, नदी, नाल्यांमुळे प्रभावीत होणाऱ्या गावांची संख्या १३० आहे. हवामान खात्याने आगामी काळात चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्याने या गावांचा संकटकाळ सुरू झाला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हिताचे ठरणारे आहे. नदी, नाल्यांवरुन पुराचे पाणी वाहत असतांना रस्ता कुणीही पार करु नये.

जुलै अखेर जलसाठा वाढीची अपेक्षाहवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक पडल्यास जुलै महिन्याच्या अखेर जलाशये भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्यता गृहीत धरून खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा