शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

भंडारा जिल्ह्यात ७९ मिमी पाऊस; बावनथडीत १०, गोसेखुर्द धरणात १४ टक्के जलसाठा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:44 IST

चार दिवसांपासून पावसाचा जोर : धान उत्पादकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा !

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात १ लाख ९५ हेक्टर क्षेत्रात धान, सोयाबीन, कापूस, भाजीपाला व अन्य पिकांची लागवड होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात २९ जूनपर्यंत १८९.३ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना केवळ ७९.९ मिमी पाऊस झाला. पडलेल्या पावसाची टक्केवारी ४२.२ इतकी आहे. सध्याच्या स्थितीत बावनथडी धरणात १०.५४ टक्के तर गोसेखुर्द धरणात १४.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धान उत्पादकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

खरीप हंगामाला प्रारंभ झाल्यापासून सिंचनाचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या काळात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे; मात्र सध्याच्या स्थितीत बावनथडी धरणात १०.५४ टक्के जलसाठा असून, गोसेखुर्द धरणात १४.४४ टक्के जलसाठा कायम आहे. कारधा येथील इशारा व धोक्याची पातळी २४५ मीटर असून सध्या वैनगंगेत २४१.५२ मीटर पाणी पातळी आहे. 

गोसे धरणातून ८० क्युमेक्स पाण्याचा विसर्गआगामी काळात पडणारा पाऊस लक्षात घेता पूर नियंत्रणासाठी २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता गोसेखुर्द धरणातून ८० क्युमेक्स क्षमतेने वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले. नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने काळजी व सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला होता.

धापेवाडा धरणाचे तीन दरवाजे उघडलेतिरोडा तालुक्यातील थापेवाडा धरणातून २७ जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रारंभी २ गेट उघडण्यात आले. तर २९ जून रोजी तीन गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत धापेवाडा धरणात २२.६९ टक्के जलसाठा असून २८९.७७ क्सुमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

१५४ गावांसाठी पावसाळा ठरतोय संकटकाळजिल्ह्यात वैनगंगा नदीकाठावर २९ गावे असून, चुलबंद ३१, बावनथडी ९, कान्हान ४, अशी १५४ गावे नदीकाठावर आहेत. तर धरण, नदी, नाल्यांमुळे प्रभावीत होणाऱ्या गावांची संख्या १३० आहे. हवामान खात्याने आगामी काळात चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्याने या गावांचा संकटकाळ सुरू झाला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हिताचे ठरणारे आहे. नदी, नाल्यांवरुन पुराचे पाणी वाहत असतांना रस्ता कुणीही पार करु नये.

जुलै अखेर जलसाठा वाढीची अपेक्षाहवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक पडल्यास जुलै महिन्याच्या अखेर जलाशये भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्यता गृहीत धरून खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा