शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात ७९ मिमी पाऊस; बावनथडीत १०, गोसेखुर्द धरणात १४ टक्के जलसाठा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 18:44 IST

चार दिवसांपासून पावसाचा जोर : धान उत्पादकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा !

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात १ लाख ९५ हेक्टर क्षेत्रात धान, सोयाबीन, कापूस, भाजीपाला व अन्य पिकांची लागवड होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात २९ जूनपर्यंत १८९.३ मिलिमीटर पाऊस पडणे अपेक्षित असताना केवळ ७९.९ मिमी पाऊस झाला. पडलेल्या पावसाची टक्केवारी ४२.२ इतकी आहे. सध्याच्या स्थितीत बावनथडी धरणात १०.५४ टक्के तर गोसेखुर्द धरणात १४.४४ टक्के जलसाठा शिल्लक आहे. धान उत्पादकांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

खरीप हंगामाला प्रारंभ झाल्यापासून सिंचनाचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या काळात सरासरी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे; मात्र सध्याच्या स्थितीत बावनथडी धरणात १०.५४ टक्के जलसाठा असून, गोसेखुर्द धरणात १४.४४ टक्के जलसाठा कायम आहे. कारधा येथील इशारा व धोक्याची पातळी २४५ मीटर असून सध्या वैनगंगेत २४१.५२ मीटर पाणी पातळी आहे. 

गोसे धरणातून ८० क्युमेक्स पाण्याचा विसर्गआगामी काळात पडणारा पाऊस लक्षात घेता पूर नियंत्रणासाठी २८ जून रोजी सायंकाळी ५ वाजता गोसेखुर्द धरणातून ८० क्युमेक्स क्षमतेने वैनगंगा नदीत पाणी सोडण्यात आले. नदी पात्रातून आवागमन करणाऱ्या नागरिकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने काळजी व सतर्क राहण्याचा इशाराही देण्यात आला होता.

धापेवाडा धरणाचे तीन दरवाजे उघडलेतिरोडा तालुक्यातील थापेवाडा धरणातून २७ जूनपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रारंभी २ गेट उघडण्यात आले. तर २९ जून रोजी तीन गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्याच्या स्थितीत धापेवाडा धरणात २२.६९ टक्के जलसाठा असून २८९.७७ क्सुमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

१५४ गावांसाठी पावसाळा ठरतोय संकटकाळजिल्ह्यात वैनगंगा नदीकाठावर २९ गावे असून, चुलबंद ३१, बावनथडी ९, कान्हान ४, अशी १५४ गावे नदीकाठावर आहेत. तर धरण, नदी, नाल्यांमुळे प्रभावीत होणाऱ्या गावांची संख्या १३० आहे. हवामान खात्याने आगामी काळात चांगला पाऊस होण्याचा अंदाज वर्तविल्याने या गावांचा संकटकाळ सुरू झाला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगणे हिताचे ठरणारे आहे. नदी, नाल्यांवरुन पुराचे पाणी वाहत असतांना रस्ता कुणीही पार करु नये.

जुलै अखेर जलसाठा वाढीची अपेक्षाहवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस समाधानकारक पडल्यास जुलै महिन्याच्या अखेर जलाशये भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यातील संभाव्यता गृहीत धरून खरिपाचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा