शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
2
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
3
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
4
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
5
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
6
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
7
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
8
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
9
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर
10
Prabodhini Ekadashi 2025: विष्णूंची योगनिद्रा संपताच सलग २१ दिवस करा ही 'प्रभावी उपासना
11
Share Market Today: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २७० अंकांनी वधारला; Nifty २४,९४२ च्या पार, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
12
VIDEO: भारताला विजयी केल्यावर जेमिमा रॉड्रिग्जची वडिलांना घट्ट मिठी, बाप-लेकीला भावना अनावर
13
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
14
मंदिरातून झाली 'मदिरा दान'ची घोषणा! आज सकाळपासूनच देशी दारूचा ठेक्यावर उसळली गर्दी, १० ची दिली होती वेळ...
15
₹५ लाखांचं बनतील ₹५० कोटी; ५ स्टेप फॉर्म्युला जो तुम्हाला देईल फायनान्शिअल फ्रीडम आणि अनस्टॉबेल ग्रोथ
16
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
17
Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतची हत्या? बहीण श्वेता कीर्तीचा धक्कादायक खुलासा; म्हणाली, "२ लोकांनी..."
18
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
19
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
20
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड

७५ टक्के मूल्यांकन पूर्ण, १२ वीचा निकाल लागणार मे अखेरीस

By आनंद डेकाटे | Updated: April 12, 2024 15:05 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षांनंतर आता मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे.

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बोर्डाच्या परीक्षांनंतर आता मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असतानाही मूल्यांकनाच्या कामावर परिणाम झालेला नाही. ७५ टक्के काम पूर्ण झाल्याचे विभागीय सचिव चिंतामण वंजारी यांनी सांगितले. बारावीचा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.

बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या प्रवेश परीक्षांची तयारी सुरू केली आहे. काही परीक्षा या महिन्यात होणार आहेत, काही मे महिन्यात. याचा अर्थ बोर्डाच्या परीक्षेतून विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी त्यांनी पुन्हा प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली आहे. बोर्डाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम वेगाने सुरू आहे. सुरुवातीला शिक्षकांनी मूल्यांकनावर बहिष्कार टाकला असला तरी नंतर त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली.

सध्या शिक्षकही निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. असे असतानाही मूल्यांकनाच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा आला नाही. यावेळी इयत्ता १२ वी मधील १,६२,५१७ विद्यार्थी आणि १० वी मधील १,५४,७२४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. नियमित वेळेवर परीक्षांचे निकाल जाहीर होतील, असे सांगितले जाते. त्यानुसार १२ वी चा निकाल मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात आणि १० वी चे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील.

टॅग्स :nagpurनागपूरexamपरीक्षा