शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

७१ टक्के लोकांना रेशनच्याच धान्याचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:07 IST

प्राधान्य गटातील रेशनकार्डधारक - ७,७६,३२६, एकूण सदस्य ३२,८५,६११ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाढती महागाई व बेरोजगारी ...

प्राधान्य गटातील रेशनकार्डधारक - ७,७६,३२६, एकूण सदस्य ३२,८५,६११

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढती महागाई व बेरोजगारी यामुळे रेशनचे धान्य हे गरिबांसाठी मोठा आधार ठरले आहे. नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपुरातील तब्बल ७१ टक्के लोक हे रेशनच्या धान्यावरच अवलंबून असल्याचे दिसून येते.

नागपूर जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ४६,५३,५७० इतकी आहे. त्या तुलनेत ११,५५,३३५ इतके रेशन कार्डधारक आहेत. यातील सदस्यांची संख्या विचारात घेतली तर तब्बल ४६,१९,७८७ इतकी होते. यापैकी ७,७६,३२६ कार्डधारक हे प्राधान्य गटातील आहेत. म्हणजेच जे रेशनचे धान्य उचलण्यास पात्र आहेत असे. यांची एकूण सदस्य संख्या ही ३२,८५,६११ इतकी आहे. म्हणजेच तब्बल ७१ टक्के लोक हे प्राधान्य गटात मोडत असून, ते रेशनचे धान्य उचलतात.

कोणत्या तालुक्यात किती

तालुका प्राधान्य गटातील कार्डधारक एकूण सदस्य

----------------------------------------

नरखेड - २८,४९१ - १,२४,७२५

हिंगणा - ३७,१३५ -१,५१,९८८

भिवापूर - १६,८१८ - ६५,९१६

नागपूर ग्रामीण - ४०,१०१ - १,६२,९९७

कामठी - ४२,९६२ - १,८६२०६

पारशिवणी - २६,१४४ - १,११,१६६

कळमेश्वर - २२,९८६ - ९५,५७९

काटोल - ३१,३११ - १,३०,५९३

उमरेड - २५,१७३ - १,०७,८२४

सावनेर - ४४,४०२ - १,८८,३९४

मौदा - २९,२४६ - १,२२,४४१

कुही - २३,६२७ -१,००,६४०

रामटेक - २७,१७२ - १,१७,०४६

नागपूर शहर - ३,८०,७६४ - १६,२०,०९६

---------------------------------------------------

एकूण ७,७६,३२६ - ३२,८५,६११

बॉक्स

- प्राधान्य गटाचे निकष काय?

बीपीएल हे कार्ड आता बंद झाले आहे. ज्यांना रेशनचे धान्य मिळते अशांना प्राधान्य गट योजनेचे लाभार्थी असे म्हटले जाते. अशा लाभार्थ्यांच्या निवडीचे काही निकष आहेत. ते पुढीलप्रमाणे - पूर्वीचे संपूर्ण बीपीएल योजनेतील शिधापत्रिका यात समविष्ट करण्यात आली आहे. शहरी भागाकरिता ज्या शिधापत्रिकाधारकांचे उत्पन्न ५९,००० रुपये आणि ग्रामीण भगातील ज्या शिधापत्रिकाधारकांचे उत्पन्न ४४,००० रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना प्राधान्य गट योजनेसाठी पात्र धरले जाते. ज्या शिधाापत्रिकाधारकांचे उत्पन्न ५९ हजार रुपये ते १ लाख रुपयांपर्यंत आहे, अशांचा केशरी शिधापत्रिका योजनेत समावेश होताे.

बॉक्स

- ७,७६,३२६ लोकांना मोफत राशन

कोरोना काळात शासनाने सर्वांना मोफत धान्याची योजना आखली होती. नागपूर जिल्ह्यातील प्राधान्य गटातील सर्व ७,७६,३२६ कार्डधारकांनी याचा लाभ घेतला. सर्वांनाच याचा लाभ मिळला. इतकेच नव्हे तर काही शिल्लक राहिले होते. त्यांनाही नंतर उर्वरित धान्याचा लाभ देण्यात आला. शासनाचे तसे आदेशच होते.

बॉक्स

तीन महिने धान्य उचलले नाही तर आपोआप बंद

रेशन धान्याचे वितरण आता ऑनलाईन झाले आहे. अधिकारी आपल्या कार्यालयात बसून किती जणांनी धान्य उचलले हे पाहू शकतात. पूर्वी खरे लाभार्थी शोधण्यासाठी मोहीम आखावी लागत होती. परंतु आता तसे नाही. प्राधान्य गटातील एखाद्या कार्डधारकाने सलग तीन महिने धान्य उचलले नाही तर त्याचे कार्ड आपोआप बंद होतो. म्हणजेच त्याला रेशनची गरज नाही असे समजून तो धान्य उचलण्यास अपात्र ठरतो.

कोट

ऑनलाईन झाल्यापासून रेशन वितरणचे काम अधिक पारदर्शी झाले आहे. रेशन दुकान पटत नसेल तर लाभार्थी आपले रेशनचे दुकानसुद्धा बदलून घेऊ शकतो. तसेच अपात्र कार्डधारक शोधणेसुद्धा आता सोपे झाले आहे. एखादा कार्डधारक सलग तीन महिने धान्य उचलत नसेल तर त्याला रेशन धान्याची गरज नाही, असे समजून तो अपात्र ठरतो. परंतु खरच गरजू असेल आणि काही करणास्तव तो धान्य उचलू शकला नाही तर तो कार्यालयात जाऊन पुन्हा आपले कार्ड सुरू करू शकतो.

भास्कर तायडे, जिल्हा पुरवठा अधिकारी