शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

खत-बियाण्यांच्या तपासणीसाठी नागपूर विभागात ७० पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके मिळावीत व त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने नागपूर विभागात ७० भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर बियाणे, खते व कीटकनाशकासंबंधी कुठलीही तक्रार आढळल्यास पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नागपूर विभागांतर्गत ...

ठळक मुद्देजिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कामकाज पाहतील

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते, कीटकनाशके मिळावीत व त्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी आयुक्तालयाच्या वतीने नागपूर विभागात ७० भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर बियाणे, खते व कीटकनाशकासंबंधी कुठलीही तक्रार आढळल्यास पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल.नागपूर विभागांतर्गत नागपूर जिल्ह्यात १५, वर्धा जिल्ह्यात ९, भंडारा येथे ८, गोंदिया येथे ९, चंद्रपूर येथे १६ तसेच गडचिरोली येथे १३ पथके तयार करण्यात आली आहेत. विभागस्तरावर तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) वाय. एस. जुमडे पथक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतील. याशिवाय जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी, तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी पथकाचे कामकाज पाहतील.अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ नुसार विक्रेत्यांनी दरफलक व साठाफलक दुकानाच्या दर्शनी भागात लावणे, वैध मुदतीतील बियाणे विक्री करणे, जास्त दराने बियाणे व खते विकणाऱ्या  दुकानदाराकडून खरेदीचे पक्के बिल मागणे आदी बाबींवर शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे. बियाणे व खतांच्या बॅगवर असलेल्या किमतीपेक्षा जास्त किंमत घेत असल्याची, विशिष्ट कंपनीचे बियाणे व खते घेण्यास बाध्य करणे, उपलब्धता नसणे, गुणवत्तेबाबत शेतकरी कुठल्याही प्रकारची तक्रार जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी तसेच विभागीय स्तरावरील तंत्र अधिकारी यांच्याकडे नोंदवू शकतात.विक्रेत्यांनी पाकीट व बॅगवरील माहिती बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करूनच विक्री करावी. माल विक्रीच्या वेळी पक्के बिल द्यावे, बिलावर शेतकºयांचे नाव, निविष्ठेचे नाव, कंपनीचे नाव, लॉट नंबर, बॅच नंबर, उत्पादन तारीख नमूद करावी.येथे करा तक्रारशेतकरी तक्रार नोंदणीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० तसेच विभागस्तर ०७१२-२५५९८१५, ९८३४८८६६२४, जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी, नागपूर ९५२७८६६६७५, कृषी विकास अधिकारी वर्धा ९४२३८९१४४५, कृषी विकास अधिकारी भंडारा ९६३७१८६७०४, कृषी विकास अधिकारी गोंदिया ९४२०८०६४३०, कृषी विकास अधिकारी चंद्रपूर ९४०४८१०३५८ तसेच कृषी विकास अधिकारी गडचिरोली ९४२२२७७४२१ वर संपर्क साधू शकतात, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक यांनी दिली आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीnagpurनागपूर