शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

७ बुडित गावांची बत्ती गुल ! उपजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 23:21 IST

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात पाणी साठविण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाचा जलस्तर दिवसागणिक वाढत आहे. प्रकल्पातील ‘बँक वॉटर’ ने बुडित गावांना वेढा घातल्यामुळे येथील घरे सुध्दा पाण्याच्या तावडीत सापडली आहे. अशात दुर्घटनेची शक्यता वर्तवित उपजिल्हाधिकाऱ्यांनी या बुडित गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. आदेश धडकताच महावितरणच्या पथकानी तालुक्यातील तब्बल सात बुडित गावांचा विद्यूत पुरवठा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास खंडित केला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना जलयातनांसह आता अंधारयातना भोगाव्या लागत आहे.

ठळक मुद्देधोक्याची शक्यता वर्तवत प्रशासनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात पाणी साठविण्याची मोहीम युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पाचा जलस्तर दिवसागणिक वाढत आहे. प्रकल्पातील ‘बँक वॉटर’ ने बुडित गावांना वेढा घातल्यामुळे येथील घरे सुध्दा पाण्याच्या तावडीत सापडली आहे. अशात दुर्घटनेची शक्यता वर्तवित उपजिल्हाधिकाऱ्यांनी या बुडित गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले. आदेश धडकताच महावितरणच्या पथकानी तालुक्यातील तब्बल सात बुडित गावांचा विद्यूत पुरवठा मंगळवारी सायंकाळच्या सुमारास खंडित केला. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना जलयातनांसह आता अंधारयातना भोगाव्या लागत आहे.गोसेखुर्द प्रकल्पात तालुक्यातील १८ गावे बुडित क्षेत्रात आली असून त्यांचे पुनर्वसन तालुकास्थळापासून काही अंतरावर करण्यात आले. यातील काही गावांना स्थलांतरित करण्यात शासनाला यश आले असले तरी काही प्रकल्पग्रस्तांनी मूळ गाव सोडण्यास माञ नकार दिला. गत दोन वर्षापूर्वीसुध्दा प्रकल्पाचा जलस्तर वाढल्यामुळे दुर्घटनेची शक्यता वर्तवत प्रशासनाने बुडित १८ गावांपैकी मरूनदीच्या पलीकडची १० गावे तर अलीकडचे एक गाव अशा ११ बुडित गावांचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे प्रकल्पग्रस्त विरुध्द प्रशासन असे शीतयुध्द पेटले होते. मात्र विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबत शासन निर्णय घेत नसल्यामुळे अखेरीस या ११ बुडित गावांतील अनेक प्रकल्पग्रस्तांनी गाव सोडत पुनर्वसनस्थळावर संसार उभा करण्यावर भर दिला.पाणी साठविण्याच्या मोहामुळे प्रकल्पाचा जलस्तर वाढून तालुक्यातील चार बुडित गावांना गत चार दिवसांपूर्वी बँक वॉटरच्या पाण्याने वेढा घातला होता. प्रशासनाने या प्रकल्पग्रस्तांना गाव खाली करून पुनर्वसनस्थळावर जाण्याची विनंती केली. मात्र प्रकल्पग्रस्त आपल्या भूमिकेवर अद्यापही ठाम आहे. अखेरीस वाढलेल्या जलस्तरामुळे धोका उद्भवण्याचे कारण पुढे करीत उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे (गोसेखुर्द) यांनी बुडित सातही गावांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले.

 या गावांचा पुरवठा खंडित    ११  बुडित गावांपैकी ७ गावांचा विद्युत पुरवठा प्रशासनाने गत दोन वर्षापूर्वी खंडित केला होता. आता शिल्लक असलेल्या मोखेबर्डी, किन्ही (कला), किन्ही (खुर्द), किटाळी, सावरगाव, नेरी, नागतरोली या सात गावांचा विद्युत पुरवठा महावितरणने खंडित केला             

असा आहे आदेशउपजिल्हाधिकारी अविनाश कातडे (गोसेखुर्द) यांनी १ सप्टेंबर रोजी कार्यकारी अभियंता विद्युत महावितरण यांना पत्र दिले असून यात गोसेखुर्द प्रकल्पाच्या जलस्तरात दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे बुडित गावांत पाणी यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या गावातील विद्युत पुरवठा बाधित होत आहे. दरम्यान विद्युत पुरवठ्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून बाधित गावातील विद्युत पुरवठा बंद करण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी आदेश दिले आहे. या निर्देशानुसार बुडित गावातील विद्यूत पुरवठा डी.पी.सह तात्काळ बंद करून वायर गुंडाळून ठेवावे. कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे नमूद केले आहे.

प्रशासनाचे कटकारस्थान?किन्ही (कला) येथील प्रकल्पग्रस्त रोशन गायधने यांनी लोकमतशी बोलताना प्रशासनाच्या या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध केला. शिवाय प्रकल्पग्रस्तांनी गाव खाली करण्यासाठी प्रशासनाने रचलेले हे कारस्थान असल्याचाही आरोप त्यांनी केला. या विरोधात असंख्य प्रकल्पग्रस्तांना घेऊन आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला .

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पPower Shutdownभारनियमन