शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

"६५ टक्के पुरुषांना नपुंसकतेचा धोका; 'जीन एडिटिंग'द्वारे समस्या दूर करण्याचा प्रयत्न" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 07:19 IST

जीवनशैली, व्यसनाधीनता, ड्रग्स अॅडिक्शन, उशिरा लग्न, बराच काळ बैठेकाम करणे आदी कारणांमुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरली आहे. 

- आनंद डेकाटे

नागपूर : प्रजननासंबंधीची समस्या ही जागतिक समस्या झाली आहे. जगातील ६५ टक्के पुरुषांना नपुंसकतेचा धोका आहे. १५ टक्के पुरुष हे नपुंसकतेने ग्रस्त आहेत. या १५ टक्के लोकांपैकी बाळ होण्याची इच्छा असलेले केवळ ८ ते १० टक्के लोकच यशस्वी होतात, तर उर्वरित ९० टक्के लोक अपयशी ठरतात. पुढील १५ ते २० वर्षांत प्रजननाचा दर झपाट्याने कमी होईल, अशी धक्कादायक बाब त्रिवेंद्रम, केरळ येथील राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटर फॉर थारक्वॉडचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. प्रदीप कुमार यांनी निदर्शनास आणून दिली.

इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले असता 'लोकमत'शी त्यांनी विशेष संवाद साधला. डॉ. प्रदीप कुमार यांनी सांगितले की, काही पुरुषांमध्ये शुक्राणू नाहीत. काहींमध्ये आहेत, पण अॅक्टिव्ह नाहीत. काहींचे शुक्राणू सक्रिय आहेत, पण महिलांच्या बीजाणूंसोबत संयोग करू शकत नाही. काही संयोग करतात, मात्र प्रजननक्षम राहिलेले नाहीत. जीवनशैली, व्यसनाधीनता, ड्रग्स अॅडिक्शन, उशिरा लग्न, बराच काळ बैठेकाम करणे आदी कारणांमुळे शुक्राणूंची गुणवत्ता घसरली आहे. 

काही वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या देशात नपुंसकत्वाची समस्या इतकी गंभीर नव्हती; परंतु आपल्या देशातही ती वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेसुद्धा ही समस्या अतिशय  गंभीरतेने घेतली आहे. हा अभ्यास बराच पुढे गेला असून, २०२४ मध्ये उंदीर व माकडांवर याची यशस्वीपणे चाचणी पार पडेल. इतकेच नव्हे तर आयसीएमआरच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष मनुष्यावर याचा प्रयोग सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रजननाशी संबंधित २५ हजारांवर जनुके असतात. काही जनुके प्रोटीन तयार करतात. त्यात काही त्रुटी आहेत का? मोलिक्युलर समस्या आहे का? ही समस्या औषधाने दूर होईल का? याचा अभ्यास किंवा दूर जीन एडिटिंगद्वारे समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.- डॉ. प्रदीप कुमार 

टॅग्स :Healthआरोग्यnagpurनागपूर