तीन महिन्यांत ६३ जणांचा अपघातात मृत्यू

By Admin | Updated: November 28, 2015 03:32 IST2015-11-28T03:32:47+5:302015-11-28T03:32:47+5:30

शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात.

63 killed in accident in three months | तीन महिन्यांत ६३ जणांचा अपघातात मृत्यू

तीन महिन्यांत ६३ जणांचा अपघातात मृत्यू


गेल्या वर्षी २६३ अपघात : २८१ जणांचा मृत्यू
नागपूर : शहरात होणाऱ्या एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होतात. ते निश्चितच टाळता येतात. असे असतानाही रस्ता वापरणाऱ्या घटकांनी याबाबत गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसत नाही. २०१४ मध्ये झालेल्या २६३ अपघातात २८१ जणांचा मृत्यू झाला. जानेवारी ते आॅगस्ट २०१५ महिन्यापर्यंत झालेल्या १६१ अपघातात १६१ जणांचे बळी गेले. धक्कादायक म्हणजे, जून ते आॅगस्ट २०१५ या तीन महिन्यांत ५६ जणांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे.
रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. यातच पार्किंगच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्र मणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड झाली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयानेउपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१० ते ३१ डिसेंबर २०१४ या वर्षात पूर्व वाहतूक शाखेत १३८७ अपघात झाले आहेत. पश्चिम, उत्तर, दक्षिण, इंदोरा, एमआयडीसी या वाहतूक शाखेच्या तुलनेत पूर्वमध्ये सर्वात जास्त अपघात झाले आहेत तर उत्तर वाहतूक शाखेच्या अंतर्गत सर्वात जास्त मृत्यू झाले आहेत. मृत्यूचा हा आकडा ३२३ वर गेला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 63 killed in accident in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.