शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

देशात ६.२५ कोटी मुले शाळाबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 22:03 IST

out of school children भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० जाहीर केले. सरकारने हे धोरण निश्चित करताना दिलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार देशात ६.२५ कोटी मुले शाळाबाह्य असल्याचे वास्तव मांडले.

ठळक मुद्देराष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अहवालात नमूद ही मुले बालमजूर तर झाली नाही ना?

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० जाहीर केले. सरकारने हे धोरण निश्चित करताना दिलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार देशात ६.२५ कोटी मुले शाळाबाह्य असल्याचे वास्तव मांडले. शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार ६ ते १४ वयोगटातील मुले ही शाळेतच असायला हवी. पण सरकारच्या आकडेवारीत जर ६.२५ कोटी मुले शाळाबाह्य असेल तर ही मुले बालमजूर तर झाली नाहीत ना? आज जागतिक बालमजूर दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार, देशात प्रत्येक ११ बालकांमागे १ बालक मजूर आहे. या संस्थेने देशातील पाच राज्यात सर्वाधिक बालमजूर असल्याचे सांगितले आहे. यात बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्राचा समावेश आहे. भारत सरकारची आकडेवारी असो की एका आंतरराष्ट्रीय मजूर संस्थेची यातून देशात असलेल्या बालमजुराची भीषण समस्या असल्याची पुष्टी होत आहे.

सरकारची पुन्हा दुसरी एक आकडेवारी जी २०११ मध्ये जनगणना केल्यानंतर प्रसिद्ध केली होती. ही आकडेवारी आंतरराज्यीय स्थलांतरित मजुरांच्या कुटुंबांच्या बाबतीत आहे. यात ० ते ४ वयोगटातील ५४.२१ लाख, ५ ते ९ वर्ष वयोगटातील ६१.१४ लाख, १० ते १४ वयोगटतील ३४.२० लाख आणि १५ ते १९ वयोगटातील ८०.६४ लाख मुले स्थलांतरित आहेत. या आकडेवारीने पुन्हा एक स्पष्ट केले की, ६ ते १४ वयोगटातील १.७५ कोटी मुले-मुली स्थलांतरित होत असून, ते शिक्षणापासून वंचित आहेत.

सरकार आणि समाजासाठी हा विषय चिंता आणि चिंतनाचा आहे. बालकांच्या संदर्भात सरकारनेही कायद्यापासून स्वतंत्र मंत्रालयाची यंत्रणा तयार केली होती. शिक्षण हक्क कायदा हा तर बालमजुरी रोखण्याचे प्रभावी शस्त्र आहे. पण हा कायदा केवळ नामांकित शाळेत बालकांच्या प्रवेशापुरताच मर्यादित राहिला आहे. एवढेच नाही तर महिला व बालकल्याण विभाग, कामगार विभाग, पोलीस विभाग, शिक्षण विभाग ही यंत्रणासुद्धा बालकांना बालमजुरीपासून रोखण्यासाठी कार्यरत आहे. पण यांना बालमजूरच सापडत नाही. बालकांसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांच्या मते शाळाबाह्य असलेली बहुतांश मुले ही बालमजूरच आहेत.

- आपल्या देशात बालकांच्या हक्काचे कायदे आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणाही आहेत. पण बालकांच्या बाबतीत गंभीर नाही. स्थलांतरित बालके छोटे-मोठे व्यवसाय, विटभट्ट्या, ऊसतोड कामगार, शेतीची कामे, रस्त्यावर भीक मागणे अशा अनेक ठिकाणी आहेत. पण यंत्रणा तिथपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे बालमजुरीचे निर्मूलन होऊ शकत नाही.

दीनानाथ वाघमारे, संयोजक, संघर्षवाहिनी

- बालमजुरी निर्मूलनासाठी यंत्रणा आहे. पण या यंत्रणेकडे किती कारवाई झाल्या, किती बालमजूर सापडले, याची आकडेवारी नाही. खरेतर सरकारी यंत्रणेला बालमजूरीशी घेणे-देणेच नाही.

मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अ‍ॅक्शन कमिटी

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी