शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
'AB फॉर्म'चा झोल केला! भाजपच्या बंडखोर उमेदवाराने पक्षालाच गंडवलं, अमित साटमांचे थेट अधिकाऱ्यालाच पत्र
3
सिगरेट, पान मसाला, तंबाखू महागणार, नवीन कर आणि सेस लागू होणार; १ फेब्रुवारीपासून किंमत वाढणार? जाणून घ्या
4
आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा
5
दोन वर्षांत १४ लाख पाकिस्तान्यांनी देश सोडला! कारण काय?
6
१ वर्षासाठी एफडीमध्ये १ लाख रुपये गुंतवून तुम्हाला किती परतावा मिळेल? कोणत्या बँकेत किती रिटर्न, पाहा
7
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
8
दूधात मिसळलं नळाचं पाणी, तेच ठरलं विष; ५ महिन्यांच्या अव्यानचा मृत्यू, १० वर्षांनी झालेला मुलगा
9
नवे वर्ष २०२६: आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी या वर्षात करा 'हे' ५ उपाय!
10
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
11
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
12
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
13
शिंदेसेनेच्या २, उद्धवसेना, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द, ७१९ उमेदवार रिंगणात
14
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
15
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
16
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
17
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
18
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
19
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
20
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा दुसऱ्या लाटेमुळे नागपुरात ६१ ज्येष्ठ आयसीयूमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 11:35 IST

Nagpur News मेडिकलमध्ये जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दीड महिन्यात ६१ ते ७० वयोगटांतील ३१, तर ४१ ते ६० वयोगटांतील ३० असे एकूण ६१ रुग्ण आयसीयूमध्ये भरती झाले.

ठळक मुद्देअधिक काळजी घेण्याचे आवाहनमेडिकलमधील दीड महिन्यातील स्थिती

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : कोरोना संसर्गाचा वेग वाढल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. याचा सर्वाधिक फटका ६० वर्षांवरील ज्येष्ठांना बसत आहे. मेडिकलमध्ये जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दीड महिन्यात ६१ ते ७० वयोगटांतील ३१, तर ४१ ते ६० वयोगटांतील ३० असे एकूण ६१ रुग्ण आयसीयूमध्ये भरती झाले. यामुळे कोरोनाचा या दुसऱ्या लाटेचा काळात ज्येष्ठांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित व मृत्यूच्या संख्येची विक्रमी नोंद झाली. परंतु ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा जोर कमी झाला. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात दैनंदिन रुग्णसंख्या २००च्या खाली आली. यामुळे कोरोना कमी झाल्याचे गृहित धरून कोरोना प्रतिबंधक नियमांकडे अनेकांनी पाठ केली. विशेषत: कोरोनाचा काळात भीतीमुळे का होईना घरात असलेले ज्येष्ठ नागरिक आता बाहेर पडू लागले. यातील अनेक जण गाफील राहिल्याने ते कोरोनाचा विळख्यात सापडले. जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान एकट्या मेडिकलच्या कोविड आयसीयूमध्ये ० ते २० वयोगटातील ६ रुग्ण, २१ ते ४० वयोगटातील १० रुग्ण, ४१ ते ६० वयोगटांतील ३० रुग्ण, तर ६१ ते ७० वयोगटांतील ३१ रुग्ण भरती झाले.

-वॉर्डातही ज्येष्ठ रुग्णांची संख्या अधिक

मेडिकलच्या अतिदक्षता विभागासोबतच सामान्य वॉर्डातही ज्येष्ठ रुग्णांची संख्या अधिक आहे. १४ ते ३१ जानेवारी २०२१ मध्ये वॉर्ड क्र. १२ मध्ये ६२ रुग्ण होते. यातील ४१ ते ६० वयोगटांतील २६, तर ६१ ते ७० वयोगटांतील २६ रुग्ण भरती होते. मागील काही दिवसांत याच वॉर्डात भरती झालेल्या ४७ रुग्णांमधून ४१ ते ६० वयोगटांतील २१, तर ६१ ते ७० वयोगटांतील १२ रुग्णांचा समावेश होता.

-वयोवृद्धांनो अधिक काळजी घ्या

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात वाढत असलेल्या रुग्णांमध्ये वयोवृद्धांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. या वयात रोगप्रतिकारशक्ती कमी झालेले असते. शिवाय, काहींना मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार असतात. यात कोरोना झाल्यास गुंतागुंत निर्माण होऊन आजार गंभीर होण्याचा धोका असतो. यामुळे वयोगवृद्धांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. गरज असल्यावरच घराबाहेर पडा. बाहेर पडताना मास्कचा वापर, शारीरिक अंतर, सॅनेटायझरचा वापर व वारंवार हात धुवायला हवे.

-डॉ. प्रशांत पाटील

प्रमुख, मेडिसीन विभाग, मेडिकल

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस