शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

नागपूर मध्यवर्ती तुरुंगातून ५४३ कैदी सोडले; पोलिसांची चिंता वाढत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 12:46 IST

कोरोना विषाणूच्या प्रकोपाचा विचार करता सरकारने तुरुंगात कैद असलेल्या गुन्हेगारांना सोडण्याची पॉलिसी निश्चित केली आहे. या नीतीमुळे तुरुंगातील गर्दी जरूर कमी करण्यात यश आले असले तरी हे अट्टल गुन्हेगार शहरात मुक्त संचार करणार आहेत. हीच भीती शहर पोलिसांच्या चिंतेचे कारण म्हणून पुढे येत आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारी घटनांत वाढ होण्याची भीती

जगदीश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रकोपाचा विचार करता सरकारने तुरुंगात कैद असलेल्या गुन्हेगारांना सोडण्याची पॉलिसी निश्चित केली आहे. या नीतीमुळे तुरुंगातील गर्दी जरूर कमी करण्यात यश आले असले तरी हे अट्टल गुन्हेगार शहरात मुक्त संचार करणार आहेत. हीच भीती शहर पोलिसांच्या चिंतेचे कारण म्हणून पुढे येत आहे. टाळेबंदी लागू झाल्यापासून नागपूर तुरुंगातून आतापर्यंत ५४३ गुन्हेगार सोडण्यात आले आहेत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारने राज्यांमधील तुरुंगातील कैद्यांना सोडण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने विचाराधीन व शिक्षा झालेल्या दोन्ही श्रेणीतील कैद्यांना मुक्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने बहुतांश तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने आणि कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता सोडण्याचा आदेश दिला होता. त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दिशेने नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून २८ मार्चपासून ते आजतागायत २२२ कैद्यांची आकस्मिक अवकाश म्हणून मुक्तता करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावामुळे मोठ्या संख्येने गुन्हेगार जामिनाकरिता न्यायालयात हजर होत आहेत. आतापर्यंत १५४ गुन्हेगारांना अंतरिम आणि १६७ गुन्हेगारांना नियमित जामिनावर सोडण्यात आले आहे. अशा तºहेने नागपूर तुरुंगातून कोरोना काळात ५४३ कैदी मुक्त झाले आहेत.हे सोडण्यात आलेल्या आरोपींमध्ये वर्तमानातील गंभीर प्रकरणांचीही नोंद घेणे अनिवार्य ठरते. याच प्रकरणांतील काही गुन्हेगारांनी तुरुंगातून बाहेर पडताच खुनासारखे गंभीर कृत्यही केले आहे. नंदनवनमध्ये क्राईम ब्रँच हवालदाराची पत्नी व सक्करदरा येथील बॅग विक्रेत्याचा खून, अशाच गुन्हेगारांनी केला होता. नंदनवन येथील गुन्हेगाराने आधीही एका युवकाचा खून केला होता. त्याच्यावर सध्या चोरीच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. त्याची पार्श्वभूमी बघितली असती तर तो तुरुंगाच्या बाहेर आला नसता. विशेष म्हणजे, सोडण्यात आलेल्या कैद्यांना त्यांच्या घरी सोडण्याचे कामही पोलीसच करत आहेत. यासाठी विशेषत्वाने बंदोबस्त ठेवण्यात येतो. कुख्यात गुन्हेगारांनाही इतक्या सहजतेने मुक्त करण्यात येत असल्याने, पोलीसही संभ्रमावस्थेत आहेत. यात अनेक सरावलेले घरफोडी करणारे व लुटपाट माजवणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना अतोनात परिश्रम घ्यावे लागले होते. त्यांना शिक्षा मिळावी म्हणूनही बराच जोर लावावा लागला होता. आता तेच गुन्हेगार बाहेर पडले आहेत आणि पुन्हा गुन्हा करण्याच्या शोधात आहेत. शहर पोलीस आधीच कोरोनाचा प्रकोपात संघर्ष करत आहेत आणि त्यात तुरुंगातून सुटलेल्या या आरोपींनी चिंता वाढवलेली आहे.भयंकर गुन्हेगार रांगेत आहेतच!तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी सरकारने खून व अन्य गंभीर प्रकरणातील आरोपींची आपात्कालिन पॅरोलवर मुक्तता करण्याचा विचार केला आहे. त्याअनुषंगाने आणखी ६०० गुन्हेगार तुरुंगाबाहेर पडण्याची शक्यता आहे. यात अनेक गुन्हेगारांची नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. हे गुन्हेगार बाहेर पडणे म्हणजे पोलिसांवरील ताण आणखी वाढणार आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिस