शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नागपूर मध्यवर्ती तुरुंगातून ५४३ कैदी सोडले; पोलिसांची चिंता वाढत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 12:46 IST

कोरोना विषाणूच्या प्रकोपाचा विचार करता सरकारने तुरुंगात कैद असलेल्या गुन्हेगारांना सोडण्याची पॉलिसी निश्चित केली आहे. या नीतीमुळे तुरुंगातील गर्दी जरूर कमी करण्यात यश आले असले तरी हे अट्टल गुन्हेगार शहरात मुक्त संचार करणार आहेत. हीच भीती शहर पोलिसांच्या चिंतेचे कारण म्हणून पुढे येत आहे.

ठळक मुद्देगुन्हेगारी घटनांत वाढ होण्याची भीती

जगदीश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रकोपाचा विचार करता सरकारने तुरुंगात कैद असलेल्या गुन्हेगारांना सोडण्याची पॉलिसी निश्चित केली आहे. या नीतीमुळे तुरुंगातील गर्दी जरूर कमी करण्यात यश आले असले तरी हे अट्टल गुन्हेगार शहरात मुक्त संचार करणार आहेत. हीच भीती शहर पोलिसांच्या चिंतेचे कारण म्हणून पुढे येत आहे. टाळेबंदी लागू झाल्यापासून नागपूर तुरुंगातून आतापर्यंत ५४३ गुन्हेगार सोडण्यात आले आहेत.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारने राज्यांमधील तुरुंगातील कैद्यांना सोडण्याची घोषणा केली होती. त्याअनुषंगाने विचाराधीन व शिक्षा झालेल्या दोन्ही श्रेणीतील कैद्यांना मुक्त करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने बहुतांश तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने आणि कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता सोडण्याचा आदेश दिला होता. त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दिशेने नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून २८ मार्चपासून ते आजतागायत २२२ कैद्यांची आकस्मिक अवकाश म्हणून मुक्तता करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावामुळे मोठ्या संख्येने गुन्हेगार जामिनाकरिता न्यायालयात हजर होत आहेत. आतापर्यंत १५४ गुन्हेगारांना अंतरिम आणि १६७ गुन्हेगारांना नियमित जामिनावर सोडण्यात आले आहे. अशा तºहेने नागपूर तुरुंगातून कोरोना काळात ५४३ कैदी मुक्त झाले आहेत.हे सोडण्यात आलेल्या आरोपींमध्ये वर्तमानातील गंभीर प्रकरणांचीही नोंद घेणे अनिवार्य ठरते. याच प्रकरणांतील काही गुन्हेगारांनी तुरुंगातून बाहेर पडताच खुनासारखे गंभीर कृत्यही केले आहे. नंदनवनमध्ये क्राईम ब्रँच हवालदाराची पत्नी व सक्करदरा येथील बॅग विक्रेत्याचा खून, अशाच गुन्हेगारांनी केला होता. नंदनवन येथील गुन्हेगाराने आधीही एका युवकाचा खून केला होता. त्याच्यावर सध्या चोरीच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. त्याची पार्श्वभूमी बघितली असती तर तो तुरुंगाच्या बाहेर आला नसता. विशेष म्हणजे, सोडण्यात आलेल्या कैद्यांना त्यांच्या घरी सोडण्याचे कामही पोलीसच करत आहेत. यासाठी विशेषत्वाने बंदोबस्त ठेवण्यात येतो. कुख्यात गुन्हेगारांनाही इतक्या सहजतेने मुक्त करण्यात येत असल्याने, पोलीसही संभ्रमावस्थेत आहेत. यात अनेक सरावलेले घरफोडी करणारे व लुटपाट माजवणाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना अतोनात परिश्रम घ्यावे लागले होते. त्यांना शिक्षा मिळावी म्हणूनही बराच जोर लावावा लागला होता. आता तेच गुन्हेगार बाहेर पडले आहेत आणि पुन्हा गुन्हा करण्याच्या शोधात आहेत. शहर पोलीस आधीच कोरोनाचा प्रकोपात संघर्ष करत आहेत आणि त्यात तुरुंगातून सुटलेल्या या आरोपींनी चिंता वाढवलेली आहे.भयंकर गुन्हेगार रांगेत आहेतच!तुरुंगातील गर्दी कमी करण्यासाठी सरकारने खून व अन्य गंभीर प्रकरणातील आरोपींची आपात्कालिन पॅरोलवर मुक्तता करण्याचा विचार केला आहे. त्याअनुषंगाने आणखी ६०० गुन्हेगार तुरुंगाबाहेर पडण्याची शक्यता आहे. यात अनेक गुन्हेगारांची नागरिकांमध्ये प्रचंड दहशत आहे. हे गुन्हेगार बाहेर पडणे म्हणजे पोलिसांवरील ताण आणखी वाढणार आहे. 

 

टॅग्स :Policeपोलिस