शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडविल्याची शंका
2
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
5
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
6
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
7
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
8
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
9
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
10
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
11
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
12
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
13
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
14
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
15
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
16
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
17
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
18
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
19
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
20
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...

५० वर्षात बँकांची संख्या तिप्पट, तर ठेवी वाढल्या २६३१ पट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 05:05 IST

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९ जून १९६९ रोजी जाहीर केले, त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली.

नागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयीकरण १९ जून १९६९ रोजी जाहीर केले, त्याला आज ५० वर्षे पूर्ण झाली. या ५० वर्षात देशातील व्यापारी बँकांची संख्या जवळपास तीनपट वाढून ८९ वरून २२२ झाली तर ठेवी मात्र २६३१ पटीने वाढून ४६४६ कोटींवरून तब्बल १२२.२६ लाख कोटींवर पोहोचल्या, अशी माहिती औरंगाबादच्या बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग अ‍ॅन्ड रिसर्च अ‍ॅकेडमीने (बेट्रा) संकलित केलेल्या आकडेवारीतून उघड होते.बँकांमधील ठेवी या जनतेच्या आर्थिक प्रगतीच्या मानक असतात या निकषावर जनतेची आर्थिक परिस्थिती सुदृढ झाल्याचा निष्कर्ष निघतो.याच कालावधीत व्यापारी बँकांचे एकूण कर्ज २१४७ पटीने वाढून ३५९९ कोटीवरून ७७.३० लाख कोटींवर गेले आहे. बँकांचे कर्जवाटप हे उद्योग/व्यापार क्षेत्रांची प्रगती दाखवते. यावरून देशातील उद्योग/व्यापार क्षेत्राने किती प्रगती केली त्याचा अंदाज येतो.या कर्जामध्ये प्राधान्य क्षेत्र म्हणजे कृषी, गृहउद्योग, लघु व मध्यम उद्योग युवा/महिला उद्योजकांचे व्यवसाय हे येतात. प्राधान्य क्षेत्राकडील कर्ज ५०४ कोटीवरून तब्बल २५.५५ लाख कोटीवर गेले आहे. प्राधान्य क्षेत्र कर्जाची ही वाढ ५०६५ पट आहे.बँकांच्या ठेवी आणि कर्जवाटप यांचे प्रमाण बँका आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहेत ते दर्शवते. साधारणत: ठेवींच्या किमान ६५टक्के कर्जवाटप मानले जाते.भारतीय बँकांचे ठेवी-कर्ज प्रमाण ५० वर्षापूर्वी ७७.५० टक्के होते ते वाढून २०१९ साली ७८.२० टक्के झाले आहे ही चिंतेची बाब आहे.>५० वर्षातील व्यापारी बँकांची प्रगतीक्र. जून १९६९ मार्च २०१९१ व्यापारी बँकांची संख्या ८९ २२२२ शाखांची संख्या ८२६२ १.४१ लाख३ ठेवी रु.४६४६ कोटी रु. १२२.२६ लाख कोटी४ कर्जवाटप रु. ३५९९ कोटी रु. ७७.३० लाख कोटी५ प्राधान्य क्षेत्र कर्ज ५०४ कोटी २५.५३ लाख कोटी६ ठेवींशी कर्जाचे प्रमाण ७७.५०% ७८.२०%